शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

श्रीवर्धन पंचायत समितीची तत्परता; कोंढेपंचतनचा पाणीप्रश्न अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 2:10 AM

दूर केली पाणीटंचाईची भीषणता

गणेश प्रभाळे  

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कोंढेपंचतन येथील वृद्ध महिलांकडून पिण्याच्या पाण्यासाठी विनवणी केली जात होती. एप्रिलच्या मध्यातच पाणीटंचाई भेडसावू लागल्याने कोंढेपंचतन गवळवाडी येथे घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू झाली. या पाणीसंकटाचे वृत्त‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन येथील पाणीसमस्या दूर करण्यात आली.

श्रीवर्धन तालुक्यातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोर्लीपंचतन ग्रुपग्रामपंचायतमध्ये कोंढेपंचतन या गावाचा समावेश आहे. ३०० हून अधिक लोकसंख्या असणाºया गावात पाणीटंचाई समस्या दरवर्षी कायमची बनली होती. विशेष म्हणजे, याच गावाच्या नावाने कोंढे धरण उशाला असून येथील ग्रामस्थांचा पाण्याविना घसा कोरडा होता. एका बाजूला प्रशासनापुढे कोरोना संक्रमणाच संकट उभे असताना दुसºया बाजूला तालुक्यातील या भागात पाणीटंचाईचे संकट होते. याची माहिती घेऊन पंचायत समितीचे अधिकारी समस्या दूर करण्यासाठी सरसावले. यामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी किशोर नागे, पाणीविभाग कर्मचारी राजेश कासरूंग, अभियंता बाळू बाक्कर, ग्रामसेवक दिनेश रहाटे व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळेत कोंढेपंचतन गवळवाडी येथे भेट दिली.उन्हाळ्यात श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासनाकडून अंदाजे एप्रिलमध्ये पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी दिले जाते. मात्र, या वेळी कोरोनाच्या संकटामुळे तालुक्यातील अनेक कामे रखडली होती. मागणी होत असताना पाणी मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात होता. कोरोनाचे संकट सर्वत्र पसरले असून संचारबंदीत कामधंदे व मजुरीही बंद आहे. एकीकडे उपासमार तर दुसरीकडे पाण्याची चणचण अशा दुहेरी संकटाचा सामना कोंढेपंचतन ग्रामस्थ करीत असताना पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी स्थानिकांनी केली. या समस्येवरचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करताच येथील दोन मैलावर नूतन बांधकाम होत असलेल्या विहिरीतील पाणी पंपाद्वारे देण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी