शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

आरसीएफच्या थळ प्रकल्पात आता मिश्र खतांची निर्मिती; २७ महिन्यांत उभारणार प्रकल्प, ‘एल ॲण्ड टी’ला कंत्राट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:03 IST

या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  खताच्या आयातीचे प्रमाण कमी होणार असून मिश्र खताच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. 

अलिबाग : थळ येथे मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले असून, २७ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा विस्तार भूसंपादन न करता होणार आहे. या प्रकल्पात युरिया आणि अमोनिया खतांची निर्मिती होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे  खताच्या आयातीचे प्रमाण कमी होणार असून मिश्र खताच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. 

आरसीएफ खत निर्मिती प्रकल्पातून सध्या युरिया आणि अमोनिया खताची निर्मिती करण्यात येत आहे. आता प्रकल्पाचा विस्तार होणार असून युरिया आणि अमोनिया बरोबरच मिश्र खतांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १०००  कोटी रुपयांची गुंतवणूक कण्यात येणार असून, प्रकल्पातून दररोज १२०० मेट्रिक टन मिश्र खत तयार करण्याचा प्रयत्न असेल. कंपनीच्या संचालक मंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले आहे.

खताच्या किमती कमी होणारडीएपीसारख्या मिश्र खतांना बाजारात मोठी मागणी आहे. मात्र भारतात त्याचे फारसे उत्पादन होत नसल्याने त्याची आयात करावी लागते. मिश्र खतांची मागणी २०१८-१९ मध्ये साडेसहा हजार दशलक्ष टनावर पोहोचली होती. त्यानंतर रशिया-युक्रेनमधील युद्ध स्थितीमुळे त्याच्या आयातीवर परिणाम झाला होता. 

ही बाब लक्षात घेऊन आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत देशांतर्गत मिश्र खतांच्या निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच  एक भाग म्हणून केंद्र सरकारने मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारणीस मान्यता दिली असून, कंपनीच्या संचालक मंडळाने प्रकल्प उभारणीचे कंत्राट मंजूर केले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार आहे. देशांतर्गत मिश्र खतांचे उत्पादन सुरू झाल्यामुळे खतांच्या किमती कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड