शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

रंग दे महाराष्ट्र अभियानाअंतर्गत रंगल्या शाळांच्या भिंती, जिल्हाधिकारी बनले चित्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 19:59 IST

मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे.

जयंत धुळप

रायगड - मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करता येवू शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरु किल्ली आहे , असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी (28 एप्रिल) माणगांव तालुक्यांतील मुठवली गावांतील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. यावेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम तसेच वरिष्ठ अधिकार्यांचे पथक उपस्थित होते.

अधिकाऱ्यांच्या संवादाने भारावले ग्रामस्थ

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील निवडक गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी चर्चा या पथकाने केली. सकाळी मुठवली ग्रामस्थांशी सर्व अधिकार्यांनी संवाद साधला,आणि ग्रामस्थ भारवून गेले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए.आर.देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाव करी ते राव न करी

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणार्या कुटूंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणोच गावाने एकत्न येऊन ठरवावे,त्यांना हवा तो विकास ते करु  शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमत स्वच्छता अभियान राबवावे,जेणे करु न स्वच्छतेची सवय मुलांच्या अंगी बाणावेल.

गावकरी आणि शासन एकत्र, विकासाचे नवे मॉडेल

ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी  गावकऱ्यांनी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान हे गावकरी आणि शासन  यांनी एकत्न येऊन तयार केलेले विकासाचे नवे मॉडेल ठरावे व त्याची सुरु वात रायगड जिल्ह्यात व्हावी, असे चांगले काम करावे , असे आवाहन केले.

आणि जिल्हाधिकारी बनले चित्रकार

ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी गावातील जि.प. शाळेच्या रंगकामात सहभाग दिला. यावेळी शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर सेवाभावी कार्यकर्त व जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी गावात आले होते. त्यांच्या मदतीने शाळेचे रंगकाम सुरु  होते.  रंग दे महाराष्ट्र  या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील मुठवली येथील शाळेच्या भिंती आज रंगल्या. हे रंगकाम एरवीच्या रंगकामापेक्षा वेगळे होते. शालेय विद्यार्थ्यांना अधिक आकलन व्हावे यासाठी या भिंतींवर शैक्षणकि चित्ने चितारण्यात आली. या अभियानात  स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम हे ही सहभागी झाले होते. दुपारनंतर या पथकाने सुधागड तालुक्यांतील महागाव व नवघर या गावातील कामांची पाहणी करु न ग्रामस्थांशी संवादही साधला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस