शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

तीन लाखांचा आपत्ती निधी उभारून गाव वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:48 IST

शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी बांधले संरक्षक बंधारे : एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकली

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी आपत्तीवर मात करीत गावासाठी आपत्ती निधी जमा केला आहे. या निधीतून त्यांनी वेळोवेळी समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक बंधारे बांधून आपल्या गावाला वाचविले आहे. एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकल्याने गावकीने एकजुटीने हा निर्णय घेत प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे बोलले जाते.

अलिबाग तालुक्यातील शहापूर हे गाव समुद्रालगत असणारे निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी भातशेतीसह मत्स्यशेतीचा उद्योग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. येथील जमिनींवर विविध खासगी कंपन्यांचा डोळा आहे. परंतु १० वर्षांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी गावाच्या विकासाचे मॉडेल सरकारला सादर केले आहे. आपापली शेती वाचविण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच पुढे असतात. त्यांची शेती समुद्रालगत असल्याने उधाणामुळे समुद्ररक्षक बंधारे फुटण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. आॅगस्ट २०१९ रोजी शहापूर येथील संरक्षक बंधाºयांना एकूण २१ खांडी (संरक्षक बंधारे तुटणे) गेल्या होत्या. खारे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेती नष्ट होणार असल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न बघता स्वत:च काम करण्याचे ठरविले. या सर्व खांडी गावातील महिला-पुरुषांनी कमरेभर पाण्यात उभे राहून वेळप्रसंगी होडीतून माती आणून स्वखर्चाने बंधारे बांधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले होते. त्यांनी तो शब्द पूर्ण करीत सात लाख रुपये रोजगार हमी योजनेतून मंजूर केले.या कामात सहभागी न होणाºया कुटुंबांना प्रति दिन ३०० रु पयांचा दंड आकारला. दरम्यान प्रत्येक जिल्ह्याचा स्वत:चा आपत्कालीन निधी असावा, अशी संकल्पना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. त्यावर प्रेरित होत शहापूर गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी त्यांचे सहकारी राकेश पाटील, रामचंद्र भोईर, अरविंद पाटील यांना जमा रक्कम आपत्ती कोषात जमा करण्याचे आवाहन केले.गावकीचा सुमारे तीन लाख आपत्ती निधी सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केला. महाराष्ट्रातील आपत्ती निधी असलेले ते पहिले गाव ठरण्याची शक्यता आहे.आपत्तीमुळे ओढवणाºया संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपत्ती निधी असणे गरजेचे आहे. निधी जमा करताना गावकीला आवाहन केले की ते स्वखुशीने मदतीचा हात पुढे करतात, असे गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी सांगितले.1एमआयडीसीने येथील काही जमिनींचे संपादन केले आहे. त्यामुळे त्या जमिनींच्या खांडी गेल्याने खारे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसते. खारे पाणी शेतामध्ये गेल्याने जमिनीला आणि पिकांनाही धोका संभवतो. आमच्या जमिनी आम्हाला वाचवाव्याच लागणार आहेत. मात्र एमआयडीसी यातून जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.2एमआयडीसीने जबाबदारी झटकली असल्याने त्याचा निषेध म्हणून बुधवार,२६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसीय भजनी आंदोलन करण्याचे नक्की केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग