शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

तीन लाखांचा आपत्ती निधी उभारून गाव वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:48 IST

शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी बांधले संरक्षक बंधारे : एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकली

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी आपत्तीवर मात करीत गावासाठी आपत्ती निधी जमा केला आहे. या निधीतून त्यांनी वेळोवेळी समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक बंधारे बांधून आपल्या गावाला वाचविले आहे. एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकल्याने गावकीने एकजुटीने हा निर्णय घेत प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे बोलले जाते.

अलिबाग तालुक्यातील शहापूर हे गाव समुद्रालगत असणारे निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी भातशेतीसह मत्स्यशेतीचा उद्योग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. येथील जमिनींवर विविध खासगी कंपन्यांचा डोळा आहे. परंतु १० वर्षांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी गावाच्या विकासाचे मॉडेल सरकारला सादर केले आहे. आपापली शेती वाचविण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच पुढे असतात. त्यांची शेती समुद्रालगत असल्याने उधाणामुळे समुद्ररक्षक बंधारे फुटण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. आॅगस्ट २०१९ रोजी शहापूर येथील संरक्षक बंधाºयांना एकूण २१ खांडी (संरक्षक बंधारे तुटणे) गेल्या होत्या. खारे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेती नष्ट होणार असल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न बघता स्वत:च काम करण्याचे ठरविले. या सर्व खांडी गावातील महिला-पुरुषांनी कमरेभर पाण्यात उभे राहून वेळप्रसंगी होडीतून माती आणून स्वखर्चाने बंधारे बांधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले होते. त्यांनी तो शब्द पूर्ण करीत सात लाख रुपये रोजगार हमी योजनेतून मंजूर केले.या कामात सहभागी न होणाºया कुटुंबांना प्रति दिन ३०० रु पयांचा दंड आकारला. दरम्यान प्रत्येक जिल्ह्याचा स्वत:चा आपत्कालीन निधी असावा, अशी संकल्पना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. त्यावर प्रेरित होत शहापूर गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी त्यांचे सहकारी राकेश पाटील, रामचंद्र भोईर, अरविंद पाटील यांना जमा रक्कम आपत्ती कोषात जमा करण्याचे आवाहन केले.गावकीचा सुमारे तीन लाख आपत्ती निधी सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केला. महाराष्ट्रातील आपत्ती निधी असलेले ते पहिले गाव ठरण्याची शक्यता आहे.आपत्तीमुळे ओढवणाºया संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपत्ती निधी असणे गरजेचे आहे. निधी जमा करताना गावकीला आवाहन केले की ते स्वखुशीने मदतीचा हात पुढे करतात, असे गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी सांगितले.1एमआयडीसीने येथील काही जमिनींचे संपादन केले आहे. त्यामुळे त्या जमिनींच्या खांडी गेल्याने खारे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसते. खारे पाणी शेतामध्ये गेल्याने जमिनीला आणि पिकांनाही धोका संभवतो. आमच्या जमिनी आम्हाला वाचवाव्याच लागणार आहेत. मात्र एमआयडीसी यातून जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.2एमआयडीसीने जबाबदारी झटकली असल्याने त्याचा निषेध म्हणून बुधवार,२६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसीय भजनी आंदोलन करण्याचे नक्की केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग