शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तीन लाखांचा आपत्ती निधी उभारून गाव वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:48 IST

शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी बांधले संरक्षक बंधारे : एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकली

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ग्रामस्थांनी आपत्तीवर मात करीत गावासाठी आपत्ती निधी जमा केला आहे. या निधीतून त्यांनी वेळोवेळी समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक बंधारे बांधून आपल्या गावाला वाचविले आहे. एमआयडीसीसह खारभूमीने जबाबदारी झटकल्याने गावकीने एकजुटीने हा निर्णय घेत प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यांत अंजन घातल्याचे बोलले जाते.

अलिबाग तालुक्यातील शहापूर हे गाव समुद्रालगत असणारे निसर्गरम्य गाव आहे. या ठिकाणी भातशेतीसह मत्स्यशेतीचा उद्योग करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. येथील जमिनींवर विविध खासगी कंपन्यांचा डोळा आहे. परंतु १० वर्षांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी गावाच्या विकासाचे मॉडेल सरकारला सादर केले आहे. आपापली शेती वाचविण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच पुढे असतात. त्यांची शेती समुद्रालगत असल्याने उधाणामुळे समुद्ररक्षक बंधारे फुटण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. आॅगस्ट २०१९ रोजी शहापूर येथील संरक्षक बंधाºयांना एकूण २१ खांडी (संरक्षक बंधारे तुटणे) गेल्या होत्या. खारे पाणी शेतामध्ये घुसल्याने शेती नष्ट होणार असल्याने ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न बघता स्वत:च काम करण्याचे ठरविले. या सर्व खांडी गावातील महिला-पुरुषांनी कमरेभर पाण्यात उभे राहून वेळप्रसंगी होडीतून माती आणून स्वखर्चाने बंधारे बांधले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासित केले होते. त्यांनी तो शब्द पूर्ण करीत सात लाख रुपये रोजगार हमी योजनेतून मंजूर केले.या कामात सहभागी न होणाºया कुटुंबांना प्रति दिन ३०० रु पयांचा दंड आकारला. दरम्यान प्रत्येक जिल्ह्याचा स्वत:चा आपत्कालीन निधी असावा, अशी संकल्पना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. त्यावर प्रेरित होत शहापूर गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी त्यांचे सहकारी राकेश पाटील, रामचंद्र भोईर, अरविंद पाटील यांना जमा रक्कम आपत्ती कोषात जमा करण्याचे आवाहन केले.गावकीचा सुमारे तीन लाख आपत्ती निधी सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केला. महाराष्ट्रातील आपत्ती निधी असलेले ते पहिले गाव ठरण्याची शक्यता आहे.आपत्तीमुळे ओढवणाºया संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आपत्ती निधी असणे गरजेचे आहे. निधी जमा करताना गावकीला आवाहन केले की ते स्वखुशीने मदतीचा हात पुढे करतात, असे गावकीचे अध्यक्ष अमरनाथ भगत यांनी सांगितले.1एमआयडीसीने येथील काही जमिनींचे संपादन केले आहे. त्यामुळे त्या जमिनींच्या खांडी गेल्याने खारे पाणी लगतच्या शेतामध्ये घुसते. खारे पाणी शेतामध्ये गेल्याने जमिनीला आणि पिकांनाही धोका संभवतो. आमच्या जमिनी आम्हाला वाचवाव्याच लागणार आहेत. मात्र एमआयडीसी यातून जबाबदारी झटकत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.2एमआयडीसीने जबाबदारी झटकली असल्याने त्याचा निषेध म्हणून बुधवार,२६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी अलिबाग येथील कार्यालयासमोर एक दिवसीय भजनी आंदोलन करण्याचे नक्की केले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग