शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 12:45 AM

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

- आविष्कार देसार्ईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाने हिरवी शाल पांघरल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. पावसाळ्यात येथील स्थळे त्यांना आकर्षित करतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी, छेडछाडीचे प्रकार, गड-किल्ल्यावर मद्यपान करणे असे प्रकार होतात. त्यातून तेथील पर्यटन स्थळांवर आपत्तीसारख्या घटना घडतात. यावर जिल्हा प्रशासनाने बंधने आणली आहेत.तसेच गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी गाइड घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच आता पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा हंगाम असला तरी पावसाळ््यातही पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.उत्साहाच्या भरात काही पर्यटक नियम, कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ््यात पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्यांवर जाणे पसंत करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर, तीनवीरा धरण, पनवेल तालुक्यातील पांडवकडा, गाढेश्वर धरण, खालापूर तालुक्यातील झेनिथ, कर्जतमधील आषाणे, सोलनपाडा, माणगाव तालुक्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटातील धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात, महिला-मुलींची छेड काढतात, समुद्राच्या पाण्यात खोलवर जातात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्याने पर्यटकांना प्राणही गमावावे लागले आहेत.पर्यटकांना सुरक्षा मिळावी, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. खास करून पावसाळी पर्यटन करण्यासाठी येणाºया पर्यटकांना आपली नोंदणी करून स्थानिक गाइडला घेऊनच गड-किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. तसेच कोथळी गड (पेठ किल्ला), इरशाळगड (कर्जत), प्रबळगड (पनवेल) या ठिकाणीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सर्वत्र आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई केली आहे. गड-किल्ल्यांवर पर्यटन करताना आता गाइड सोबत घ्यावा लागणार आहे. गड , किल्ल्यांवर जाताना स्थानिक प्रशासनास पर्यटकांची नावे व संपर्क क्र मांक देवून नोंदणी करावी लागणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे नावनोंदणी करावी लागणार आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाºया पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.- वन विभागाच्या हद्दीत येथील कर्मचारी पर्यटकांवर लक्ष ठेवून नोंदणी करणार आहेत. हुल्लडबाज, छेडछाड करणाºयांवरही पोलीस दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागतच आहे, जीव धोक्यात घालू नका, अथवा कायदा मोडू नका तसे झाल्यास कडक कारवाई करणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.या गोष्टींची काळजी घ्याप्रशासनाच्या नियमाचे पालन करामद्यपान करून हुल्लडबाजी करू नकामहिला-मुलींची छेडछाड करू नकाधोकादायक ठिकाणी जाणे टाळामद्यप्राशन करून वाहन चालवू नकापर्यटनस्थळांवर महिला, मुली, लहान बालके आणि वयोवृद्धांची काळजी घ्याखोल पाण्यात जाऊ नका

टॅग्स :Raigadरायगड