शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 00:45 IST

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

- आविष्कार देसार्ईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाने हिरवी शाल पांघरल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. पावसाळ्यात येथील स्थळे त्यांना आकर्षित करतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी, छेडछाडीचे प्रकार, गड-किल्ल्यावर मद्यपान करणे असे प्रकार होतात. त्यातून तेथील पर्यटन स्थळांवर आपत्तीसारख्या घटना घडतात. यावर जिल्हा प्रशासनाने बंधने आणली आहेत.तसेच गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी गाइड घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच आता पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा हंगाम असला तरी पावसाळ््यातही पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.उत्साहाच्या भरात काही पर्यटक नियम, कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ््यात पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्यांवर जाणे पसंत करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर, तीनवीरा धरण, पनवेल तालुक्यातील पांडवकडा, गाढेश्वर धरण, खालापूर तालुक्यातील झेनिथ, कर्जतमधील आषाणे, सोलनपाडा, माणगाव तालुक्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटातील धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात, महिला-मुलींची छेड काढतात, समुद्राच्या पाण्यात खोलवर जातात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्याने पर्यटकांना प्राणही गमावावे लागले आहेत.पर्यटकांना सुरक्षा मिळावी, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. खास करून पावसाळी पर्यटन करण्यासाठी येणाºया पर्यटकांना आपली नोंदणी करून स्थानिक गाइडला घेऊनच गड-किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. तसेच कोथळी गड (पेठ किल्ला), इरशाळगड (कर्जत), प्रबळगड (पनवेल) या ठिकाणीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सर्वत्र आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई केली आहे. गड-किल्ल्यांवर पर्यटन करताना आता गाइड सोबत घ्यावा लागणार आहे. गड , किल्ल्यांवर जाताना स्थानिक प्रशासनास पर्यटकांची नावे व संपर्क क्र मांक देवून नोंदणी करावी लागणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे नावनोंदणी करावी लागणार आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाºया पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.- वन विभागाच्या हद्दीत येथील कर्मचारी पर्यटकांवर लक्ष ठेवून नोंदणी करणार आहेत. हुल्लडबाज, छेडछाड करणाºयांवरही पोलीस दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागतच आहे, जीव धोक्यात घालू नका, अथवा कायदा मोडू नका तसे झाल्यास कडक कारवाई करणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.या गोष्टींची काळजी घ्याप्रशासनाच्या नियमाचे पालन करामद्यपान करून हुल्लडबाजी करू नकामहिला-मुलींची छेडछाड करू नकाधोकादायक ठिकाणी जाणे टाळामद्यप्राशन करून वाहन चालवू नकापर्यटनस्थळांवर महिला, मुली, लहान बालके आणि वयोवृद्धांची काळजी घ्याखोल पाण्यात जाऊ नका

टॅग्स :Raigadरायगड