शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पावसाळी पर्यटनस्थळे, पर्यटक प्रशासनाच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 00:45 IST

मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात.

- आविष्कार देसार्ईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने निसर्गाने हिरवी शाल पांघरल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्याला पर्यटकांकडून नेहमीच पसंती दिली जाते. पावसाळ्यात येथील स्थळे त्यांना आकर्षित करतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी, छेडछाडीचे प्रकार, गड-किल्ल्यावर मद्यपान करणे असे प्रकार होतात. त्यातून तेथील पर्यटन स्थळांवर आपत्तीसारख्या घटना घडतात. यावर जिल्हा प्रशासनाने बंधने आणली आहेत.तसेच गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी गाइड घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच आता पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.मुंबई, पुण्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे बाराही महिने मोठ्या संख्येने येत असतात. येथील पर्यटन स्थळे, गड-किल्ले, बौद्धकालीन लेण्या, विस्तृत आणि स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत पर्यटनाचा हंगाम असला तरी पावसाळ््यातही पर्यटनाला येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.उत्साहाच्या भरात काही पर्यटक नियम, कायदे धाब्यावर बसवतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ््यात पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्यांवर जाणे पसंत करतात. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील सिद्धेश्वर, तीनवीरा धरण, पनवेल तालुक्यातील पांडवकडा, गाढेश्वर धरण, खालापूर तालुक्यातील झेनिथ, कर्जतमधील आषाणे, सोलनपाडा, माणगाव तालुक्यातील देवकुंड, ताम्हाणी घाटातील धबधबे आदींचा समावेश आहे. या ठिकाणी पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात, महिला-मुलींची छेड काढतात, समुद्राच्या पाण्यात खोलवर जातात. त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्याने पर्यटकांना प्राणही गमावावे लागले आहेत.पर्यटकांना सुरक्षा मिळावी, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने पर्यटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. खास करून पावसाळी पर्यटन करण्यासाठी येणाºया पर्यटकांना आपली नोंदणी करून स्थानिक गाइडला घेऊनच गड-किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. तसेच कोथळी गड (पेठ किल्ला), इरशाळगड (कर्जत), प्रबळगड (पनवेल) या ठिकाणीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सर्वत्र आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यास मनाई केली आहे. गड-किल्ल्यांवर पर्यटन करताना आता गाइड सोबत घ्यावा लागणार आहे. गड , किल्ल्यांवर जाताना स्थानिक प्रशासनास पर्यटकांची नावे व संपर्क क्र मांक देवून नोंदणी करावी लागणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे नावनोंदणी करावी लागणार आहे. गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाºया पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.- वन विभागाच्या हद्दीत येथील कर्मचारी पर्यटकांवर लक्ष ठेवून नोंदणी करणार आहेत. हुल्लडबाज, छेडछाड करणाºयांवरही पोलीस दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे स्वागतच आहे, जीव धोक्यात घालू नका, अथवा कायदा मोडू नका तसे झाल्यास कडक कारवाई करणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.या गोष्टींची काळजी घ्याप्रशासनाच्या नियमाचे पालन करामद्यपान करून हुल्लडबाजी करू नकामहिला-मुलींची छेडछाड करू नकाधोकादायक ठिकाणी जाणे टाळामद्यप्राशन करून वाहन चालवू नकापर्यटनस्थळांवर महिला, मुली, लहान बालके आणि वयोवृद्धांची काळजी घ्याखोल पाण्यात जाऊ नका

टॅग्स :Raigadरायगड