शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

इंटरनेट घ्या आधाराला, पण पेन-कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा; UPSC सर केलेल्या प्रणवचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 13:24 IST

रायगड जिल्ह्याच्या मोहोपाडा गावातील प्रणव यूपीएससी परीक्षेत देशात १६६वा आला आहे.

मुंबईः गुगल गुरूंना वंदन केल्याशिवाय आज आपला दिवस पूर्ण होणं केवळ अशक्य झालंय. इंटरनेटच्या काळात जगभरातील माहिती आपल्या खिशात सामावली आहे. हे सगळं खरं असलं तरी, पेन आणि कागद घेऊन केलेला अभ्यासच खरा, यूपीएससीसारख्या मोठ्या परीक्षांना सामोरं जाताना तोच उपुयक्त ठरतो, असा मोलाचा सल्ला प्रणव कानिटकर या यशवंत तरुणानं 'लोकमत'शी बोलताना दिला आहे. रायगड जिल्ह्याच्या मोहोपाडा गावातील प्रणव यूपीएससी परीक्षेत देशात १६६वा आला आहे. आत्मविश्वास न गमावता, हार न मानता, पाचव्या प्रयत्नात त्यांनं मिळवलेलं हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. 

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज माहितीचे अनंत स्रोत उपलब्ध झालेत. ही जशी जमेची बाजू आहे, तशीच धोक्याचीही आहे. कारण, एवढी माहिती बऱ्याचदा गोंधळ उडवून देते. त्यामुळे योग्य स्रोतांमधून माहिती मिळवणं, तिचं नियोजन करणं आणि आपल्या अभ्यासाची पद्धत ओळखून ती आत्मसात करणं हेच यशाचं गमक असल्याचं प्रणवनं सांगितलं. मोबाइल, टॅब्लेट किंवा संगणकावर दिवसभर माहिती वाचली, तरी ती डोक्यात फिट्ट बसेलच असं नाही. म्हणूनच, कागद-पेन घेऊन बसण्याशिवाय पर्याय नाही, असं त्यानं नमूद केलं.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा २०१७ या वर्षाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात महाराष्ट्राचा झेंडा डौलाने फडकला आहे. या गुणवंतांपैकी एक असलेल्या प्रणवसाठी हा निकाल म्हणजे सुखद धक्काच आहे. कारण, ही त्यांच्यासाठी शेवटची संधी होती. चार वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता, तो पाचव्यांदा या परीक्षेला बसला होता आणि अखेर त्यानं आपलं ध्येय गाठलंच. माझी मेहनत आणि जिद्द आहेच, पण आई-वडील आणि भाऊ यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मी मिळवू शकलो, अशी प्रांजळ भावना प्रणवने व्यक्त केली.

प्रणवने आपलं बारावीपर्यंतचे शिक्षण रसायनी-मोहोपाडा येथील जे.एच.अंबानी स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर, पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून तो बी.ए. झाला. पुढे, पुण्याच्याच गोखले इन्स्टिट्यूटमधून इकॉनॉमिक्स विषयात त्यानं एम.ए. केलं. यूपीएससीकरीता हिन्दी साहित्य हा अतिरिक्त विषय त्याने निवडला होता. दरम्यानच्या काळात प्रणवनं गुरुग्राम येथे अॅनालिटीक्स कंपनीत नोकरी केली. वेळेचं सुयोग्य नियोजन करून त्याने यूपीएससीचा अभ्यासही नेटाने सुरू ठेवला होता. त्याच्या या परिश्रमांचं आज चीज झालं आहे. 

प्रणवचे वडील अनंत महादेव कानिटकर हे मोहोपाडा-रसायनी औद्योगिक वसाहतीमधील बॉम्बे डाईंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कायर्रत होते, तर त्याची आई अनघा कानिटकर या व्यवसायाने वकील आहेत.

(Inputs: जयंत धुळप, रायगड)

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग