शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रायगडचे किल्लेदार पारंपरिक, नवे की बंडखोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 05:14 IST

उरणमधील बंडाळीकडे सर्वाधिक लक्ष : चार उमेदवार हॅट्ट्रिकच्या तयारीत, काँग्रेसपुढे भोपळा फोडण्याचे आव्हान

बंडखोरांची संख्या वाढल्याने यंदा रायगडच्या लढाईत ठिकठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. तेथे दोन जागा राखताना एक जादा आमदार निवडून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष प्रयत्नशील आहे. भाजपने दोन उमेदवारांना विधानसभेत पाठवण्यासाठी कंबर कसली आहे.

शिवसेना दोनाचे तीन आमदार व्हावे, या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या दोन्ही जागा राखण्याच्या धडपडीत आहे, तर काँग्रेसला मात्र भोपळा फोडावा लागणार आहे. युतीत अलिबाग, श्रीवर्धन, महाड, कर्जत, उरण मतदारसंघात शिवसेना, पनवेल आणि पेणमध्ये भाजप लढते आहे. आघाडीमुळे अलिबाग, पेण, पनवेल, उरणमध्ये शेकाप, कर्जत आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, रिंगणात आहेत. महाडची जागा लढवतानाच काँग्रेस अलिबाग आणि पेणमध्ये मैत्रीपूर्ण लढतीत आहे.

उरणमध्ये भाजपचे महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्याविरोधात थोपटलेले दंड सर्वाधिक चर्चेत आहेत. अलिबागमध्ये काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांनी काँग्रेसच्याच अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांना आव्हान दिले आहे. तेथे दीर-भावजयीत सामना आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याविरोधात काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, दानिश लांबे आणि मोईझ शेख यांनी बंडाचा झेंडा फडकावलाआहे.

युतीतील बेबनाव, मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली आघाडीतील संघर्ष, शेकापपुढे गड राखण्याचे आव्हान यामुळे जिल्ह्याचे किल्लेदार पारंपरिक असतील, की नवे याकडे लक्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी गेले काही दिवस ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा राग आळवत मैत्रीपर्व वाढवले. त्याचा परिणाम लोकसभेत दिसला. आताही दोन्ही पक्षांनी सध्याच्या चार जागा राखण्यासाठी आधीपासून तयारी केली आहे. पनवेलमध्ये रामशेठ आणि प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यात पाय रोवले. आता पेणमध्ये विस्तारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुद्दाम वेळ काढत पेणमध्ये सभाही घेतली. तेथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची फिल्डिंग कशी कामी येते ते महत्वाचे.

प्रचारातील प्रमुख मुद्दे

१राज्याला दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा असूनही पायाभूत सुविधांचा अभाव. पण त्यातून परस्परांवर फक्त आरोप. घराणेशाहीचा मुद्दाही प्रचारात.

२ मुंबईपासून जवळ असल्याने अनेक प्रकल्पांनी ग्रासलेला आणि त्या प्रश्नांतून पोळलेला जिल्हा.

३नाणारमधून येणारा तेलशुध्दिकरण प्रकल्प किंवा नवनगर हा नवा प्रकल्प सध्या चर्चेत.

४ भाताचे कोठार अशी असलेली ओळख पुसून सध्या प्रकल्प, उधाणामुळे नष्ट होणारी शेती ही ओळख.

रंगतदार लढती

श्रीवर्धन मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती प्रथमच विधानसभेच्या रिंगणात आहेत. राजकारणात कसलेले शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी त्यांचा सामना आहे. अंतर्गत वादामुळे त्यांचे चुलत भाऊ अवधूत सेनेसोबत आहेत.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, पेण मतदारसंघात शेकापचे धैर्यशील पाटील, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे सुरेश लाड हे उमेदवार हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्या लढतींकडे लक्ष लागले आहे.

पनवेलनंतर पेणमध्ये विजय मिळवून कोकणातील ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. त्याला शेकाप कशी टक्कर देतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

उरण मतदारसंघात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. याचा फायदा शेकापचे विवेक पाटील उचलतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019