शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामे संथ गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:20 IST

आपत्तीपूर्व नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येणारी नालेसफाई म्हणावी तशी पूर्ण झालेली दिसत नाही.

अलिबाग : मान्सून लवकरच धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु आपत्तीपूर्व नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यात करण्यात येणारी नालेसफाई म्हणावी तशी पूर्ण झालेली दिसत नाही. ३० मेपर्यंत तरी नालेसफाई पूर्ण होणार का असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे आराखडेही सहा तालुके वगळता अद्यापही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नसल्याने आपत्ती व्यवस्थापनानबाबत किती सजगता आणि जागरूकता आहे हेच यावरून दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ््यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी असते. नद्या, नाले, ओढे, धरण दुथडी भरून वाहत असतात. पावसाच्या कालावधीत कोणतीही आपत्ती ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी आपत्तीबाबतचे पूर्वनियोजन करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आपत्तीचा आढावा घेण्यासाठी मध्यंतरी एक बैठकही आयोजित केली होती. या बैठकीमध्ये तालुकानिहाय आपत्ती नियोजन आराखडा सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले होते.महाराष्ट्रातील अतिवृष्टी परिसरात रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, वीज पडणे, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. रायगड जिल्हा मुंबई-पुण्याच्या जवळ असल्याने वाहतूक आणि बाजारपेठेच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रही झपाट्याने वाढलेले आहे. त्यामध्ये तळोजा, महाड, रोहे, धाटाव, खालापूर, पाताळगंगा या पट्ट्यांमध्ये रासायनिक कंपन्यांचे जाळे विणले गेले आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे, कोकण रेल्वेचे मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग याच जिल्ह्यातून जात असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.जिल्ह्यातील सावित्री, गांधारी, काळ, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, बाळगंगा, भोगावती, गाढी, उल्हास या नद्यांना अतिवृष्टीने उधाण येते, तसेच खाड्याही भरून वाहतात. भरती आणि सतत पडणारा पाऊस आणि त्याच वेळी समुद्राला भरती आल्यास महाड, गोरेगाव, माणगाव, रोहे, अलिबाग तालुक्यातील काही सखल भागांमध्ये पाणी येऊन पूर परिस्थिती निर्माण होते. परिणामी गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, टायफॉईडच्या साथीने थैमान घातले होते.८४ गावांना दरडीचा जास्त धोकावरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ८४ गावांना दरडींचा धोका जास्त प्रमाणात आहे. जिल्ह्याला चक्रीवादळाचाही धोका आहे. २००९ साली फयान वादळामुळे घर आणि गोठ्यांचे नुकसान होऊन मोठी वित्त हानी झाली होती.चक्रीवादळाचा धोका विशेष करून समुद्र किनारी असलेले अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील गावे आणि शहरांना आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुस्थिती असणे अत्यावश्यक आहे.प्रत्येक तालुका ठिकाणच्या प्रांताधिकारी, तहसीलदार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, आरोग्य व्यवस्था, कंपन्या यांच्यासह अन्य घटकांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करणे अतिशय सोपे जाते. मात्र अलिबाग, महाड, रोहे, माथेरान, पनवेल, कर्जत यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे, तर उर्वरित तालुक्यांचे काम सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.नगर पालिका हद्दीतील नालेसफाईची कामे सुरू आहेत. आज घडीला ती किती टक्के पूर्ण झाली याचे मोजमाप करणे कठीण आहे. नालेसफाई वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा नगर पालिका प्रशासन प्रमुख प्रभारी महेश चौधरी यांनी सांगितले.काही नगर पालिका हद्दींमधील नालेसफाई सुरू झाली आहे, तर अद्याप काही ठिकाणी ती सुरू झालेली नाही. कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर, पावसाचे पाणी त्या नाल्यांमध्ये साचून शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती आपत्ती व सुरक्षा विषयक तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी व्यक्त केली.आपत्तीचे आराखडे एक महिना आधीच जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर दिलेले आराखडे खरोखरच आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहेत का हे मॉकड्रीलच्या माध्यमातून तपासणे सोपे जाईल, आराखड्यातील बदलाची माहितीबाबत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018