शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कळंब-बोरगाव रस्त्याचे निकृष्ट काम पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 12:09 AM

कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे;

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर अनेक वर्षांनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने हे काम उंबरखांड आणि बोरगाव ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेऊन पोलिसांच्या मदतीने बंद पाडले आहे.कळंब-बोरगाव या एक कि.मी.च्या रस्त्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी कामाची पाहणी केल्यानंतर या पूर्वीच्या रस्त्यावर डांबर न टाकता केवळ खडी टाकण्याचे काम सुरू होते. याबाबत ग्रामस्थ एकनाथ खडेकर, दत्ता खडेकर व इतर ग्रामस्थ मंडळींनी याबाबत जाब विचारला असता ठेकेदारांनी अरेरावी केली व तुम्हाला कुणाकडे तक्रार करायची ती करा, असे उत्तर दिले. याबाबत ग्रामस्थांनी पत्रकारांना बोलावून सदर रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे खडी बाजूला करून दाखवून दिले.>ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यातकळंब-बोरगाव या रस्त्याला तात्पुरता पर्यायी मार्ग असतानाही ठेकेदारांनी हे काम रात्री उशिरा अतिशय घाईत उरकण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. या रस्त्याने उंबरखाड, बोरगाव, कळंब व आदिवासी वाड्यातील प्रवासी ये-जा करीत असतात; पण रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने खडी अंथरून काम सुरू केले होते.या ग्रामीण भागातील रस्त्यावर दहा ते पंधरा वर्षे पुन्हा रस्त्याचे काम होत नाही. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करतात. त्यामुळे लगेचच हा रस्ता उखडतो आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात, म्हणूच ग्रामस्थांनी हे निकृष्ट दर्जाचे काम पाहत पोलिसांच्या मदतीने बंद पाडले. पुन्हा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे.सदर कामाची पाहणी करून त्या रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यात येईल. या रस्त्याचे काम त्वरित थांबवण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कार्यादेशानुसार करण्यात येईल.- के. ए. केदारे, उप अभियंता, रायगड जिल्हा परिषद,बांधकाम विभागसदर रस्त्यावर कुठेही डांबर टाकलेले दिसत नाही. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. याबाबत काम करणाऱ्या ठेकेदारांना विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा केली. सदर रस्त्याचे काम मंगळवारी रात्री ७ वाजेपर्यंत अंधारात चालू होते. यावरून काम किती घाईत उरकण्यात आले आहे याची कल्पना येते. हा रस्ता ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यवस्थित करून द्यावा.- दत्तात्रेय खडेकर,ग्रामस्थ, बोरगाव