शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुधागड तालुक्यात प्लॅस्टिकबंदी धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:38 IST

पाली शहरासह ग्रामीण भागात सर्रास वापर; मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचे आरोग्य धोक्यात

- विनोद भोईर पाली : राज्यभरात गेल्या वर्षी २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेक ठिकाणी छापे टाकून प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. सुरुवातीस काही महिने बंदीची चांगली अंमलबजावणी झाली. मात्र, कारवाईत सातत्य नसल्याने सध्या पालीसह ग्रामीण भागात, मच्छी विक्रेते, व्यापारी, छोटे दुकानदार, टपरी, हातगाडीवाले, फेरीवाल्यांकडून सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री आणि वापर होत आहे. प्लॅस्टिकचा वाढता वापर पर्यावरणाच्या ºहासास कारणीभूत ठरत आहे.राज्य सरकारने प्लॅस्टिक उत्पादन, वापर, विक्री, साठवण, थर्माकोल आदींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. या निर्णयानुसार विघटन होत नसलेल्या वस्तू वापरण्यास मनाई केली आहे. काही वस्तूंच्या उत्पादनाची गरज लक्षात घेऊन त्या वस्तूंवर कठोर नियम व अटी लादून परवानगी देण्यात आली आहे. समाज माध्यमांमध्ये त्यासंदर्भात जनजागृती सुरू झाली, मात्र सध्या जिल्ह्यात वेगळे चित्र आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकबंदीच्या सूचना व पत्रके देण्यात आली.काही ठिकाणी व्यापाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. त्यानंतर काही दुकानदारांवर प्लॅस्टिक पिशवी विक्री व ठेवल्याप्रकरणी दंडही करण्यात आला. नागरिकही बाजारात हातात कापडी पिशव्या घेऊन येताना दिसत होते. मात्र, आता पुन्हा दोन-तीन महिन्यांपासून प्लॅस्टिकने डोके वर काढले असून कारवाईची गरज निर्माण झाली आहे.अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी१५ मार्च २०१८ रोजी राज्य मंत्रिमंडळाने एक वेळ वापरण्यात येणाºया प्लॅस्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. विशेषत: मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांचा विरोधात पर्यावरणीय मोहिमेची सुरू झाल्यानंतर विघटन न होणाºया प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली; परंतु नियमांत बदल करीत २0 मायक्रॉनपासून ६0 मायक्रॉनपर्यंत प्लॅस्टिकपिशव्यांच्या जाडीत वाढ झाली.शेती, जनावरांना धोकाग्रामीण भागात प्लॅस्टिक कचरा उकिरड्यावर टाकला जातो. काही प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून अन्नपदार्थ टाकले जातात. मग मोकाट कुत्रे व गुराढोरांच्या पोटात प्लॅस्टिक जाते. त्यामुळे त्यांचा मृत्यूही ओढावत आहे. शेतजमिनीवर प्लॅस्टिक असेच पडून राहिल्याने जमिनीचा पोत आणि सुपीकता कमी होते.प्लॅस्टिकचा वापर आणि विल्हेवाट लावताना जमिनीचा कचरा, पाणीसाठा आणि नैसर्गिक परिसर त्यामध्ये गंभीर समस्या निर्माण होतात. या गुंतागुंतीमध्ये त्या ठिकाणचे वन्यजीवन आणि मानव वस्तीला धोका निर्माण झाला आहे.समाज प्रबोधनाची गरजप्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणे लोकांनी थांबवावे यासाठी समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटना व सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर कसा करता येईल व पर्यावरणाला धोका टाळता येईल.प्लॅस्टिक विकणाºया व्यापाºयांवर कारवाई केली आहे. त्यांचे प्रबोधनही केले आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि लोकांचे असहकार्य यामुळे कदाचित प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री व वापर वाढला आहे. त्यामुळे लोकांनी स्वत: या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्लॅस्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे.- गणेश बाळक, सरपंच पाली

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी