शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 02:45 IST

विद्यार्थ्यांचा संदेश : गोळा के ल्या ६० किलो बिया

दत्ता म्हात्रे 

पेण : शिक्षण जगतात उन्हाळी सुट्टीच्या सत्रामध्ये विद्यार्थीवर्ग पर्यटनातून झाडांच्या बिया गोळा करून त्या बिया परिसरातील रस्ते, उजाड माळरानात टाकून त्याद्वारे उपजत वृक्षनिर्मिती करण्याचा अनोखा व अभिनव उपक्रम पेणमधील खासगी शाळेचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी गेली चार ते पाच वर्षे सातत्याने राबवित आहेत. यावर्षीही उन्हाळी सुट्टीच्या हंगामात परिसरातील माळरान व वृक्षवनराई भागात निसर्ग पर्यटनातून तब्बल ६० किलो विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत. गोळा केलेल्या बिया पावसाअगोदर ओसाड माळराने व रस्त्याच्या कडेला टाकण्याची लगबग विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे यांची सुरू आहे.

पर्यावरण जनजागृतीसाठी, ‘नेहमीची येतो पावसाळा आणि बियांची परिसरात पेरणी करा’ हा संदेश घेऊन जागोजागीचे गावकरी, शेतकरी, प्रवासी व वृक्षप्रेमी मित्र परिवारांकडे प्रसारित करत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा हा अभिनव प्रयोग वृक्षनिर्मितीसाठी करणे ही अतिशय मोलाची बाब ठरत असल्याने नागरिकांमध्येही या उपक्रमांबाबत चर्चा केली जात आहे.२0१९ हे वर्ष जागतिक तापमानवाढीचे उच्चांक मोडणारे ठरले आहे. निसर्गाशी समतोल न राखता होणारा विकास हा मानवी संस्कृतीच्या विनाशास कारणीभूत ठरत असल्याच्या अनेक घटना सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहेत. भरमसाठ झालेली जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, अनेक प्रकल्पांसाठी डोंगर फोडून केले जाणारे मातीचे उत्खनन यामुळे झाडांची संख्या कमी होऊन माळराने उजाड होत आहेत. माणूसच पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरलेला आहे. अनेक प्रसंगात मानवाच्या जाणाऱ्या बळींची संख्याही या निसर्गाच्या असमतोलामुळे वाढली आहे. या समस्येवर कायमचा प्रभावी उपाय म्हणजे वृक्षलागवड होय. त्यासाठी पर्यावरण संवर्धन संकल्पना हाती घेऊन राष्ट्रीय हरित सेना उन्हाळी सुट्टीच्या हंगामात अनेक वृक्षांच्या बिया गोळा करण्यासाठी विद्यार्थीवर्ग दिवसभर उन्हातानात आपला छंद जोपासून एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या बियांचे वाटप व बियांची परिसरात पेरणी अशा दोन्ही प्रकारे आपले उद्दिष्ट साध्य करताना दिसत आहे.या विद्यार्थ्यांनी रेनट्री, करंज, चिंच, काजू, शमी, हादगा, बदाम, जांभूळ, आंबा, बेल व इतर अनेक प्रकारच्या झाडांचे बी गोळा करून आपला परिसर वृक्ष वनराईने समृद्ध व्हावा म्हणून मान्सूनपूर्व बी पेरणीसाठी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.माळरानावर पेरणीच्विद्यार्थी ही जैवविविधता जोपासण्यासाठी झाडांच्या शेंगा, बी, परिपक्व झालेली फळे यांच्या माध्यमातून मिळालेल्या बी प्रत्यक्ष हातात घेऊन जागोजागी माळरानावर रस्त्याच्या कडेला टाकताना दिसत आहेत.च्याशिवाय हे बी निसर्गप्रेमी, वृक्षमित्र, शेतकरी, नागरिक यांनासुद्धा मोफत पेरण्यासाठी देण्यात येत आहे. राष्ट्रीय हरित सेनेतील या विद्यार्थी वर्गाला ऋतुमानाच्या कालगणनेनुसार कोणत्या झाडाला कोणत्या ऋतूत कोणती फळे येतात, याचे ज्ञान प्रा. उदय मानकवळे यांनी पर्यावरण शिक्षणातून दिलेले आहे.

टॅग्स :Raigadरायगडenvironmentवातावरण