शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘अलिबागसे आया है क्या’वाक्यावर बंदीसाठी न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:15 AM

‘अलिबागसे आया है क्या’ या वाक्यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अलिबाग  -  ‘अलिबागसे आया है क्या’ या वाक्यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र ठाकूर यांच्या वतीने अ‍ॅड. रघुराज देशपांडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. ‘अलिबाग से आया है क्या’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा अद्यापही सोक्षमोक्ष लागलेला नाही.सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिकांमधून प्रचलित झालेले काय रे अलिबागवरून आला आहेस का? हे वाक्य तू मूर्ख आहेस का? या आशयाने वापरले जात असल्याने विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारे आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.कान्होजी आंग्रे, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, यासारख्या अनेक थोर व्यक्ती अलिबागमध्ये होऊन गेल्या असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खासगी उद्योगधंदे, प्रकल्प हे अलिबागचे महत्त्व अधोरेखित करतात. सेन्सॉर बोर्डाला कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशाप्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत केली गेली आहे.ठोस पावले उचलावीतएखाद्या व्यक्तीला का रे अलिबागहून आलास का? असे हिणवून अलिबागवासीयांचा अवमान केला जात आहे, असा आरोप करून या वाक्याविरोधात बीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काही तरी ठोस पावले उचलावीत, या मागणीची याचिका दाखल केली गेली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागCourtन्यायालय