शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नागरिकांना घेणे गरजेचेच - जयपाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:29 IST

आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे.

- आविष्कार देसाईआपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपत्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी अलिबाग शहरातील एक अवलीया तसा प्रयत्न करत आहे. त्यांचे नाव आहे जयपाल पाटील. त्यांनी आजपर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. यासाठी ते राज्यासह राज्याबाहेरही जाऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगतात. त्याच आपत्तीच्या योद्ध्याशी थेट संवाद साधला.आपत्ती व्यवस्थापनावर कामकरावे असे का वाटले?अलिबाग तालुक्यातील काचळी येथे १९९१ साली पुराने थैमान घातला होता. आंबा नदीचे पाणी सर्वत्रच घुसले होते. त्या वेळी मी आरसीएफ कंपनीमध्ये नोकरीला होतो. आरसीएफ प्रशासनाने सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासह अन्य सहकाऱ्यांना मदतीसाठी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गाव उभे केले. त्यानंतर बºयाच वर्षांनी नागरी संरक्षण दल उरण येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेले प्रगत प्रशिक्षण सातत्याने घेत आहे. रायगड जिल्ह्याचा नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कामही केले.नेमके कोणत्या प्रकारे आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देता?अपघात घडल्यावर जखमींना लगेच पाणी न पाजता सर्वप्रथम रुग्णवाहिका बोलवावी, आवश्यकता वाटल्यास अग्निशमन दल त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करावे. बुडलेल्यांना बाहेर काढल्यावर कोणता प्रथमोपचार द्यावा, गृहिणीचा जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो. त्यांनी गॅस, इलेक्ट्रिक उपकरण हाताना काळजी घ्यावी, साप, विंचू चावल्यावर कोणता प्रथम उपचार द्यावा, विषारी, बिनविषारी साप कसा ओळखावा याचे प्रशिक्षण दिले जाते.आपत्तीचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे या मताचा मी आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, पोलीस पाटील, ग्रामसेवक, साखर कारखान्यातील कामगार, पोलीस दल, सुरक्षारक्षक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, शेतकरी, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर यांना तसेच मुंबई, सोलापूर, रत्नागिरी आकाशवाणीवरून आपत्ती व्यवस्थापनाची सुमारे २७१ व्याख्याने दिली आहेत.शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्ररांची येथील शिख रेजिमेंटच्या १५० अधिकाºयांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्र दिला आहे. आसाम-गोहत्ती, कर्नाटक हंप्पी येथील संपादक आणि पत्रकारांनाही आपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. आजवर जेवढी प्रशिक्षण शिबिर पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका यांचा सिंहाचा वाटा आहे.

टॅग्स :Raigadरायगड