शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नागरिकांना घेणे गरजेचेच - जयपाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 03:29 IST

आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे.

- आविष्कार देसाईआपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपत्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी अलिबाग शहरातील एक अवलीया तसा प्रयत्न करत आहे. त्यांचे नाव आहे जयपाल पाटील. त्यांनी आजपर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. यासाठी ते राज्यासह राज्याबाहेरही जाऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगतात. त्याच आपत्तीच्या योद्ध्याशी थेट संवाद साधला.आपत्ती व्यवस्थापनावर कामकरावे असे का वाटले?अलिबाग तालुक्यातील काचळी येथे १९९१ साली पुराने थैमान घातला होता. आंबा नदीचे पाणी सर्वत्रच घुसले होते. त्या वेळी मी आरसीएफ कंपनीमध्ये नोकरीला होतो. आरसीएफ प्रशासनाने सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासह अन्य सहकाऱ्यांना मदतीसाठी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गाव उभे केले. त्यानंतर बºयाच वर्षांनी नागरी संरक्षण दल उरण येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेले प्रगत प्रशिक्षण सातत्याने घेत आहे. रायगड जिल्ह्याचा नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कामही केले.नेमके कोणत्या प्रकारे आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देता?अपघात घडल्यावर जखमींना लगेच पाणी न पाजता सर्वप्रथम रुग्णवाहिका बोलवावी, आवश्यकता वाटल्यास अग्निशमन दल त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करावे. बुडलेल्यांना बाहेर काढल्यावर कोणता प्रथमोपचार द्यावा, गृहिणीचा जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो. त्यांनी गॅस, इलेक्ट्रिक उपकरण हाताना काळजी घ्यावी, साप, विंचू चावल्यावर कोणता प्रथम उपचार द्यावा, विषारी, बिनविषारी साप कसा ओळखावा याचे प्रशिक्षण दिले जाते.आपत्तीचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे या मताचा मी आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, पोलीस पाटील, ग्रामसेवक, साखर कारखान्यातील कामगार, पोलीस दल, सुरक्षारक्षक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, शेतकरी, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर यांना तसेच मुंबई, सोलापूर, रत्नागिरी आकाशवाणीवरून आपत्ती व्यवस्थापनाची सुमारे २७१ व्याख्याने दिली आहेत.शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्ररांची येथील शिख रेजिमेंटच्या १५० अधिकाºयांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्र दिला आहे. आसाम-गोहत्ती, कर्नाटक हंप्पी येथील संपादक आणि पत्रकारांनाही आपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. आजवर जेवढी प्रशिक्षण शिबिर पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका यांचा सिंहाचा वाटा आहे.

टॅग्स :Raigadरायगड