शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 1:59 AM

प्रदूषणात वाढ : रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येतो रसायनिक वायू

वैभव गायकर

पनवेल : दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी सम-विषम वाहने चालविण्यात येत असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पनवेलमध्ये उद्भवली आहे. शहरीकरणाबरोबर तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे पनवेलमधील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत असून, रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे पनवेलकर त्रस्त आहेत. ज्येष्ठांबरोबरच लहान मुले, तरुणांमध्येही श्वासोच्छ्वासाचे आजार बळावत असल्याने दिसून येत आहे.

दिवाळीनंतर थंडी वाढते. त्याचबरोबरच धुके पसरायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुक्याबरोबरच वातावरणात धुराचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धुक्याच्या आडून पनवेल, तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांमधून दूषित विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जात आहेत.प्रदूषणाची आकडेवारीची माहिती देणाºया एका साइटवर गेल्या २४ तासांत हवेची सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५७ म्हणजेच आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलमध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे तसेच एमआयडीसीतील काही भागात सध्या अतिशय उग्र दर्प अनुभवास येत आहे.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या विषय तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेला आहे. लवादाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला दंड ठोठावला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत अद्यापही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ बेफिकीर असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा फटका स्थानिकांबरोबरच खारघर, तळोजा नोड, पनवेल परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पनवेलमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, प्रदूषणासंदर्भात राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती फोनवर देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना अधिकारी वर्ग मात्र जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले.उग्र वायूने नागरिक हैराणखारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरातील नागरिकांना संध्याकाळ होताच उग्र दर्पाला सामोरेजावे लागते. हा दर्प नवजात बालके, श्वसनाचात्रास असलेल्यांसाठी घातक आहे. याबाबतप्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.वायुप्रदूषणामुळे उद्भणारे आजारच्श्वासोच्छ्वासाचा त्रास बळावतो.च्घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ होणेच्स्मरणशक्तीवर परिणाम होतोच्चिडचिड वाढते.च्एकाग्रतेत बाधा येते.च्फुप्फुसांना सूज येते. परिणामी, रक्तवाहिन्या व हृदयाला इजा होण्याची शक्यता बळावते

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडpanvelपनवेल