शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

माठांपेक्षा पाणीजार जोरात, रायगडमध्ये पाच वर्षांत ट्रेण्ड बदलला

By निखिल म्हात्रे | Published: April 15, 2024 4:49 PM

काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत.

अलिबाग : उन्हाळा सुरू झाला की, मातीचे माठ खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळत होती. आता त्याऐवजी पाण्याचे जार घरोघरी दिसत आहेत. ग्रामीण भागातही या व्यवसायाने चांगलेच बस्तान बसवले आहे.

काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करत होते. त्यामुळे माठाला प्रचंड मागणी होती, पण अलीकडे हे दिवस संपले आहेत.

शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे ‘उद्योग’ उघडण्यात आल्याने व या पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही, या धंद्यामध्ये स्पर्धाही मोठी आहे.

जारमध्ये पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० लीटरसाठी ७० रुपये किंमत होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली. पाण्याच्या जारचे दर हळूहळू कमी होत गेले. ७० रुपयांवरून हा दर घरपोच ५० रुपये झाला.

दीड ते दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही आता माठ खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

थंड पाण्याच्या जारमुळे पारंपरिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येत १०० ते १५० पर्यंतच्या किमतीचे माठ विक्री करत होतो. आता शंभर, दोनशे माठ विकले जात नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. - रविकिरण नांदगावकर, माठ व्यावसायिक.

टॅग्स :alibaugअलिबाग