शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

रासायनिक प्रकल्पांमुळे उरणकरांमध्ये दहशत; स्फोटाचा धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 06:59 IST

रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उरण : जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल, आयएमसी, इंडियन आइल, आयओटीएल, विराज अग्रो आदी मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायू, रसायनांची हाताळणी केली जाते. तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदी प्रकल्पांचाही यात समावेश आहे. रासायनिक प्रकल्पात वारंवार आग, स्फोटाच्या घटना घडत असून त्या आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे अद्ययावत, स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो. मात्र, जेव्हा दुर्घटना घडते, त्या वेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात. यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.

ओएनजीसीच्या प्रकल्पात मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने उरण ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.उरण परिसरात प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे. या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० कि.मी. परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या तोंडावर उरण असल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते.

रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आग आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाशांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.

ओएनजीसीतील आगीच्या कारणमीमांसेसाठी बैठकउरण : ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी लागलेली आग आणि त्यामुळे उरणकरांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत कारणमीमांसेवर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांच्या महत्त्वाच्या बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह तेलीपाडा -उरण येथे आयोजित बैठकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी केले आहे. उरण शहराच्या वेशीवर असलेल्या ओएनजीसी प्रकल्पात नाफ्ता या ज्वालाग्राही वायूची गळती झाली आणि वातावरणात पसरलेल्या नाफ्त्याने पेट घेतला. सुदैवाने ती आग नियंत्रणात आणली गेली; परंतु त्या प्रयत्नात चार कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.

टॅग्स :RaigadरायगडBlastस्फोट