शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

उद्योगांसाठी आवश्यक पर्यावरण मंजुरीसाठी ऑनलाइन जनसुनावणीला घेतली हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:10 AM

लॉकडाऊन असल्याने गावात प्रत्यक्ष जनसुनावणी घेता येत नाही. त्यामुळे मंडळाने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून निवडक लोकांना एकित्रत करून जनसुनावणी घेणे सुरू केले आहे.

अलिबाग : जिल्ह्यात नवीन उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरण मंजुरीसाठी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून आॅनलाइन जनसुनावणीच्या निर्णयाला रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी हरकत घेतली आहे. जिल्ह्यातील उद्योगांसाठी घेण्यात येणाºया आॅनलाइन सुनावणीमध्ये प्रकल्पामुळे बाधित होणारे शेकडो शेतकरी, मच्छीमार, खेड्यातील नागरिक आॅनलाइन उपस्थित राहू शकत नसल्याने आॅनलाइन सुनावणी रद्द करून ज्या वेळी कोरोनाचे संकट दूर होईल तेव्हाच प्रत्यक्ष लोकांच्या उपस्थितीमध्ये जनसुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.लॉकडाऊन असल्याने गावात प्रत्यक्ष जनसुनावणी घेता येत नाही. त्यामुळे मंडळाने झूम अ‍ॅपच्या माध्यमातून निवडक लोकांना एकित्रत करून जनसुनावणी घेणे सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील नानावली येथील व्हेरीटास पॉलीकेम प्रा.लि. यांच्या प्रस्तावित पॉली विनाईल क्लोराईड (पीव्हीसी) प्लांट, पॉलीमर मॉडीफाइड बिटुमेन (पीएमबी) प्लांट, गॅस स्टोरेज टर्मिनल, एलपीजी बॉटलिंग प्लांट, गॅस बेस्ड कॅप्टीव्ह पॉवर प्लांट, सी वॉटर डिसेलीनेशन प्लांट, (आरओ प्रक्रि या) यांचा समावेश असलेल्या एकात्मिक प्रकल्पाची आॅनलाइन जनसुनावणी २९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील नानावली येथील गट क्र . ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५६, ६१, ६३, ६६ व ७५-अ या दिघी बंदर विकास क्षेत्रामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे. आॅनलाइन सुनावणीमुळे नानावली गाव व परिसरातील तसेच श्रीवर्धन तालुक्यातील इच्छुक लोकांना या आॅनलाइन सुनावणीमध्ये सामील होणे शक्य होणार नाही, असे मत अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केले आहे.पर्यावरणीय मंजुरी देण्याच्या प्रक्रि येपासून लोकसहभाग कमी करण्यासाठी किंवा काढून टाकण्याची तरतूद नवीन पर्यावरण मसुद्यात (ईआयए २०२०) असल्याने हा मसुदा रद्द करण्यासाठी काँग्रेसतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी यापूर्वीच केंद्र शासनाकडे हरकत दाखल केली आहे. नवीन मुसद्यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मतास अधिक वजन दिले आहे. जरी उल्लंघनासंदर्भात कुणी तक्रार केली तरी प्रकल्पाचा सार्वजनिक अहवाल देणेदेखील मंत्रालयावर बंधनकारक असेलच असे नाही. त्यामुळे सरकार उद्योगपतींना पाठीशी घालण्यासाठी हे बदल करीत असल्याचा आक्षेप स्थानिक शेतकरी व पर्यावरण विषयात काम करणाºया कार्यकर्त्यांनी घेतला होता. आॅनलाइन जनसुनावणी हा लोकांच्या मतांचा प्रकल्पामध्ये सहभाग कमी करण्याचा एक प्रयत्न असू शकतो; म्हणून रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या जनसुनावण्या आॅनलाइन न घेता कोरोना संकट दूर झाल्यावर प्रत्यक्ष बाधित लोकांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांनी केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड