शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

पावसानंतर आता नुकसानीचा सामना; महसूल प्रशासनाकडून पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:50 IST

हजारो नागरिकांच्या घरांचे नुकसान; पीक गेल्याने शेतकरी चिंतित

अलिबाग : पावसाने काही कालावधीसाठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पेणमध्ये आलेल्या पुराने हजारो नागरिकांचे प्राण गळ्याशी आले होते. एनडीआरएफच्या मदतीने बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या मदतीसाठी सोमवारी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. पुरामध्ये घरांचे, गोठ्यांचे, शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाने सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पडलेल्या दरडीही बाजूला करण्यात आल्या आहेत.गेल्या तीन दिवसांपासून अखंडित बरसणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. सतत पडणाºया पावसामुळे नद्यांचे पाणी थेट नागरी वस्त्यांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचे आतोनात नुकसान झाले. याच पुराच्या पाण्यामध्ये हजारो नागरिक अडकून पडले होते. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफची टीम रविवारी पहाटे पेण तालुक्यात हजर झाली होती. त्यांनी बचाव कार्य सुरू करून कणे येथील सुमारे ६०० नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले होते. अलिबाग, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, रोहा आणि कर्जत या ठिकाणी पुराचा कहर मोठ्या प्रमाणात होता. त्याचप्रमाणे मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात रविवारी हटवलेला मलबा सोमवारी युद्धपातळीवर मार्गातून दूर करण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये पोलादपूर तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर पडलेली दरड आणि पेण-दुष्मी तसेच रोहा तालुक्यातील रेल्वे ट्रॅकवरील दरडीचा समावेश आहे. सध्या या मार्गावरून आता सुरळीत वाहतूक सुरू आहे.ठिकठिकाणी राज्यमार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यामध्ये उन्मळून पडलेले वृक्ष तोडण्याचे काम सोमवारी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे धिम्या गतीने सुरू असलेली वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने उद्भवणाºया आपत्तीच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. भारतीय लष्करातील सुमारे ५५ जवान हे पेण तालुक्यात दाखल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या आपत्तीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पेण तालुक्यातील अंतोरे येथील रेसक्यू केलेल्या ६६ नागरिकांमधील वयावृद्ध, महिला, गरोदर माता, लहान मुले यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्याची व पांघरुणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा आणि मदतीसाठी भारतीय लष्कर अलर्ट मोडवररायगड जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षितता आणि मदतीसाठी आलेले भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. पुणे येथून ५५ जणांची टीम पेण येथे दाखल झाली आहे. कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली तर तातडीने तेथे मदत आणि बचाव कार्यासाठी तत्पर राहणार आहे. पेण शहरातील हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.१०५१ नागरिकांना के ले स्थलांतरितअलिबाग तालुक्यातील बोरघर गावातील १७५ व खानावमधील ९३ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पेण तालुक्यातील अंतोरे ६६, कणे ९०, वाशी ५०, शिर्की ७०, माणगाव- चिंचवली सोन्याची वाडी ६३, रोहे-नागोठणे ५०, सुधागड- चिवे खुरवले फाटा २५, पनवेल-कातकरीवाडी ७५, खालापूर-बोरगाव ताडवाडी-२५३, आचरे फार्म हाउसमधील ३५ पर्यटक अशा एकूण १०५१ नागरिकांना रविवारी आणि सोमवारी रेसक्यू करून सुखरूप काढण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस