शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Lokmat Exclusive: ना घरचं जेवण, ना मिनरल वॉटर, अर्णब गोस्वामी दोन दिवसांपासून फक्त बिस्किटांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 18:35 IST

Lokmat Exclusive: अलिबागमधली एका शाळेत दोन रात्र अर्णब गोस्वामींना मुक्काम  करावा लागला. याच शाळेतल्या एका खोलीत गोस्वामी सर्वसामान्य आरोपीसारखेच राहत आहेत

ठळक मुद्देअलिबागमधली एका शाळेत दोन रात्र अर्णब गोस्वामींना मुक्काम  करावा लागला. याच शाळेतल्या एका खोलीत गोस्वामी सर्वसामान्य आरोपीसारखेच राहत आहेत.

अविष्कार देसाई

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्मावी यांनी केवळ बिस्कीटावर दोन रात्री काढल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोस्वामी कोठडीत अस्वस्थ झाले असून त्यांना त्रास होत आहे. त्यातच, रात्री मच्छरांनी झोपू दिलं नाही, कारागृह प्रशासनाने नवे कपडे दिले नाहीत आणि चवीचं जेवण न मिळाल्याने काही खाताही आलं नाही. एवढी कमी होतं म्हणून, कोविडच्या कठोर नियमांनी कुणी भेटायलाही आलं नाही. नेहमी लक्झरीयस आणि फाईव्ह स्टार लाईफ जगणाऱ्या गोस्वामींवर आता ही वाईट वेळ आली आहे. 

अलिबागमधली एका शाळेत दोन रात्र अर्णब गोस्वामींना मुक्काम  करावा लागला. याच शाळेतल्या एका खोलीत गोस्वामी सर्वसामान्य आरोपीसारखेच राहत आहेत. उप-कारागृहाच्या घोलीत एक पंखा आणि खाट इतकीच काय ती सोय करण्यात आली आहे. मात्र, एकाच पंख्याच्या भरोशावर असलेल्या गोस्वामींना शुक्रवारच्या रात्री डासांनी हैराण करुन सोडल्याचं सुत्रांनी सांगितलं. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता इतर कैद्यांप्रमाणे ते उठले, पण आंघोळीसाठी उप कारागृहाचं पाणी चालत नसल्याने त्यांनी बिना अंघोळीचं राहणं पसंत केलं. विशेष म्हणजे, गोस्वामी यांनी उप कारागृह प्रशासनाकडे मिनरल वॉटरची आणि बाहेरच्या जेवणाची मागणी केली होती. मात्र, त्यांची एकही मागणी पूर्ण न झाल्याने केवळ बिस्कीटं खाऊन त्यांना कारागृहात रात्र काढावी लागली आहे. 

समोर जेवण आहे, पोटात भूक आहे, पण खाता येत नाही.. पाणी आहे, पण मिनरल नाहीये... त्यामुळे प्यायलाही येत नाही. टेलिव्हीजनवरुन पुछताँ है भारत... असं म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींना सध्या पुछता है तुरुंगाधिकारी ... अशी केविलवाणी अवस्था अर्णब गोस्वामी यांची झाली आहे. स्टार आणि झगमगाटाचं आयुष्य जगणाऱ्या अर्णब यांना तात्पुरत्या स्वरुपातील या कारागृहात गुदमरल्यासारखं होत असल्याचं तेथील सुत्रांनी सांगितलं. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीCrime Newsगुन्हेगारीRaigadरायगडPoliceपोलिस