शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

निजामपूर अबडुंगीत गुरांच्या वाड्याला आग; ३ म्हशींचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:51 IST

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत तीन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील अबडुंगी गावालगत असणाऱ्या गुरांच्या वाड्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत वाड्यात बांधलेल्या ६ म्हशीपैकी ३ म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी भाजल्याने जखमी झाल्या आहेत. निजामपूरपासून २ कि.मी. अंतरावर ही घटना घडली.या आगीत शेतकऱ्याचे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. वअबडूंगी गावालगत मनोहर उतेकर यांचा गुरांचा वाडा (गोठा) असून वाड्यात ६ म्हशी बांधलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना खाण्यासाठी भाताचा पेंडाही मोठ्या प्रमाणात साठवलेला होता. दुपारी या वाड्यात असणाऱ्या वीजवाहिनीला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. त्यात वाड्यातील भाताच्या पेंड्याने पेट घेतला. त्यामुळे आग पसरून वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत तीन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत. जखमी म्हशींवर तातडीने निजामपूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवगुंडे यांनी उपचार केले तर वाड्याची कौले, वाशे, ढापे यांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजा रणपिसे, माजी सरपंच बाळाराम दबडे, कोस्ते खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य गोविंद कासार यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकऱ्याला शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, निजामपूरचे तलाठी आगे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :Raigadरायगड