शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

स्वच्छ शहरासाठी खोपोली नगरपालिकेचे पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:54 IST

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून

खोपोली : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात स्वच्छता सर्वेक्षण सुरू झालेले आहे. नागरिकांचा सक्रि य सहभाग अतिशय मोलाचा असून, पालिकेच्या कर्मचारीवर्गानेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करून आपले काम चोख बजावले पाहिजे. कोणतेही अभियान सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होऊ शकते. या वेळी कामगारांनी नियमित कामकाज करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवून सेवा देण्याचे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी केले.खोपोली नगरपरिषद कर्मचाºयांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे व खोपोलीचे मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी ३५० कर्मचाºयांना प्रशिक्षण व प्रभावी कामकाजाबाबत धडे दिले.खोपोली शहर स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत यशस्वी होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यात नागरिकांचाही सहभाग वाढवून देश पातळीवरील या स्पर्धेत उच्च मानकरी होण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू आहेत. शहरात स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असणाºया कामगारांना सकारात्मक कामासाठी मार्गदर्शन व विविध सूचना देण्यासाठी शनिवारी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, आरोग्य सभापती अलका शेंडे, मुख्याधिकारी संजय शिंदे, उप मुख्याधिकारी राजेंद्र पांढरपट्टे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.पालिकेच्या सेवेत असणारे सर्व विभागांतील अधिकारी, कामगार, मुकादम या सर्वांनी या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शपथ घेतली. तसेच स्वच्छतेप्रति नागरिकांत जागृकता व आवड निर्माण करून देण्यासाठी या शिबिरात महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.शहरात कोणत्याही भागात कचरा दिसणार नाही, गटारे तुंबलेली दिसणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यासाठी साधन सामग्रीची तत्परता नगरपालिकेकडून देण्यात येईल, असे मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नागरिकांनी केलेल्या सूचनेचे पालन करून आपली सेवा द्या, जेणेकरून या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढवून, खोपोली नगरपालिका या स्पर्धेची मानकरी ठरेल, असे आवाहन शिंदे यांनी केले. उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनीही मार्गदर्शन करताना खोपोली शहराच्या प्रत्येक प्रभागात वेळेत स्वच्छता झाली पाहिजे, त्यासाठी वेळेवर कामावर हजर राहून जनतेला अपेक्षित असणारी स्वच्छता करा, अशी सूचना केली. दुसºया सत्रात कर्जतचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी त्यांचा कार्यालयीन अनुभव, सोबत सकारात्मक व नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपायांबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच खोपोलीस मिळत असलेला सकारात्मक पाठिंबा बघता स्वच्छता मोहिमेमध्ये खोपोली नगरपालिका जिल्ह्यात किंवा राज्यात नाही तर देशात अग्रभागी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान