शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नेरळ-कळंब जिल्हा मार्ग खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:37 AM

रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता

नेरळ : नेरळ-कळंब जिल्हा मार्गावरील बिरदोले गावाजवळ बुधवारी सकाळी अचानक रस्ता खचला आहे. या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून, येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नसल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधानपणे वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिक व नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर बिरदोले गावाजवळ असणारी मोरी खचून पूर्ण रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमीन खचली असल्याचे बोलले जात आहे. नेरळ वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूककोंडी कमी करण्याचा प्रयत्न करत असून, अनेक प्रवाशांना सूचना देत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यावरील हा खचलेला भाग लवकरात लवकर चांगला करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या या रस्त्यावरून दुचाकी जात असल्या तरी चारचाकी वाहने जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मराठा मोर्चामुळे ठेकेदारांनीही काम बंद केले आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यासाठी माणसे मिळत नाही. त्यामुळे लवकरच या रस्त्यावरील खचलेला भाग भरण्यात येईल आणि रस्ता चांगला करण्यात येईल.- आर. एम. वेलदोडे, शाखाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागनेरळ-कळंब रस्ता बिरदोले गावाजवळ मध्यभागी खचला आहे. त्यामुळे चारचाकी वाहने या रस्त्यावरून जात नाही. त्यामुळे येथे वाहतूककोंडी झाली आहे. हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडून वाहनचालकांना वाहने सावधानपणे चालवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.- मदन पाटील, वाहतूक पोलीस, नेरळ

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड