शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:45 AM

रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने पडणाºया पावसाचे पाणी अडवण्यासाठी नव्याने जिल्ह्यात एकाही धरणाची निर्मिती झालेली नाही. उलट प्रस्तावित असणारी धरणे कागदावरच रखडली आहेत. सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. जिल्हा प्रशासनाला टंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करत आहे.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना शेतीला पाणी कोठून मिळणार. जिल्ह्यात पुरेशी धरण नसल्याने शेतांमध्येही शेतकऱ्यांना केवळ एकच पीक घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकºयांना दुबार आणि तिबार पीक आपापल्या शेतात घेता येतील आणि शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल; परंतु कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कोणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे निधीच शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील मोठी धरण पूर्ण होताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सांबरकुंड, सारल घोळ यासह अन्य रखडलेली धरणे पूर्ण झाली पाहिजेत, प्रत्येक तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक धरण उभारले पाहिजे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :konkanकोकणRainपाऊस