शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

‘निसर्ग’चा गिधाडांनाही फटका; वादळात झाडांबरोबर घरटी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:17 IST

सिस्केप संस्थेच्या गिधाड संवर्धन मोहिमेत खंड

- अरुण जंगमम्हसळा : दिसायला किळसवाणा, तरीही स्वभावाने शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्षाचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत असून, सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाडांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मात्र, ३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये म्हसळा तालुक्यातील गावांना जबरदस्त फटका बसला. वादळाने बहुतेक वनराई नष्ट झाली आहेत. यामुळे संपूर्ण डोंगर भागातील या गिधाडांची घरटी असलेली झाडे या वादळात नष्ट झाली, तर काही गिधाडे मृत अवस्थेत सापडली असल्याचे सिस्केपचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले.श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिलं तर आकाशात घिरट्या घालणाऱ्या गिधाडांचा थवा आपल्या नजरेत येतो. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले असून, या चिरगाव-बागेची वाडी येथील ३१.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा, सातविण या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची घरटी पाहायला मिळतात. घरट्यांच्या आसपास साधारणत: २० ते २५ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३८ ते ४० गिधाडांचा विहार पाहायला मिळत असे. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी मागील काही वर्षांपासून म्हणजेच १९७० पासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झाली. मात्र, या गिधाडांनाही वादळाचा फटका बसला आहे. गिधाडांची घरटी असलेली झाडे उन्मळून पडल्याने या सिस्केपच्या कार्यात खंड पडला आहे. वादळापूर्वी या भागात गिधाडांची साधारणत: ४० पिल्ले घरट्यांमध्ये होती. वादळानंतर म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात बचाव पथकास फक्त ७ ते ८ पिल्ले आढळली असल्याचे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले. गिधाडांची संख्याही ३० ते ४० असून, गिधाडांनी वादळाचा ज्या भागात प्रभाव नव्हता, त्या ठिकाणी स्थलांतर केले असावे अथवा वादळात सापडले असावे, असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.स्थलांतर होण्याची शक्यता कमीगिधाडांची संख्या आजमितीस ३० ते ४० असली, तरीही त्यांची स्थलांतर होण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील आठवड्यात वन विभागाच्या मदतीने मृत जनावरांचे मांस किंवा बोकडांचे मांस त्यांना घातल्यानंतर त्यांची संख्या निश्चित होईल. गिधाडांना बंदिस्त जागेत न ठेवता, त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविणारा देशातील हा पहिला उपक्रम आहे. मात्र, वादळामुळे फार नुकसान झाले असून, याचा परिणाम गिधाडांच्या संख्येवर झाला आहे.