शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘निसर्ग’चा गिधाडांनाही फटका; वादळात झाडांबरोबर घरटी नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:17 IST

सिस्केप संस्थेच्या गिधाड संवर्धन मोहिमेत खंड

- अरुण जंगमम्हसळा : दिसायला किळसवाणा, तरीही स्वभावाने शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्षाचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत असून, सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाडांची संख्या नैसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे. मात्र, ३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये म्हसळा तालुक्यातील गावांना जबरदस्त फटका बसला. वादळाने बहुतेक वनराई नष्ट झाली आहेत. यामुळे संपूर्ण डोंगर भागातील या गिधाडांची घरटी असलेली झाडे या वादळात नष्ट झाली, तर काही गिधाडे मृत अवस्थेत सापडली असल्याचे सिस्केपचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी ‘लोकमत’ला सांगितले.श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिलं तर आकाशात घिरट्या घालणाऱ्या गिधाडांचा थवा आपल्या नजरेत येतो. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले असून, या चिरगाव-बागेची वाडी येथील ३१.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा, सातविण या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची घरटी पाहायला मिळतात. घरट्यांच्या आसपास साधारणत: २० ते २५ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३८ ते ४० गिधाडांचा विहार पाहायला मिळत असे. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी मागील काही वर्षांपासून म्हणजेच १९७० पासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झाली. मात्र, या गिधाडांनाही वादळाचा फटका बसला आहे. गिधाडांची घरटी असलेली झाडे उन्मळून पडल्याने या सिस्केपच्या कार्यात खंड पडला आहे. वादळापूर्वी या भागात गिधाडांची साधारणत: ४० पिल्ले घरट्यांमध्ये होती. वादळानंतर म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात बचाव पथकास फक्त ७ ते ८ पिल्ले आढळली असल्याचे प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले. गिधाडांची संख्याही ३० ते ४० असून, गिधाडांनी वादळाचा ज्या भागात प्रभाव नव्हता, त्या ठिकाणी स्थलांतर केले असावे अथवा वादळात सापडले असावे, असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.स्थलांतर होण्याची शक्यता कमीगिधाडांची संख्या आजमितीस ३० ते ४० असली, तरीही त्यांची स्थलांतर होण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील आठवड्यात वन विभागाच्या मदतीने मृत जनावरांचे मांस किंवा बोकडांचे मांस त्यांना घातल्यानंतर त्यांची संख्या निश्चित होईल. गिधाडांना बंदिस्त जागेत न ठेवता, त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविणारा देशातील हा पहिला उपक्रम आहे. मात्र, वादळामुळे फार नुकसान झाले असून, याचा परिणाम गिधाडांच्या संख्येवर झाला आहे.