शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री भावाचं कुटुंब संपवलं अन् सकाळी आरतीला लावली हजेरी; कर्जत हत्याकांडाचे गूढ उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:35 IST

कर्जतमधील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मृताच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

Raigad Crime : कर्जतमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. पती-पत्नी आणि मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह एका ओढ्यात फेकण्यात आले होते. आता या प्रकरणाचा उलघडा झाला आहे.  या तिहेरी हत्याकांडा प्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ आणि वहिनीला पोलिसांनी अटक केली आहे. भावानेच तिघांचीही कुऱ्हाडीने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या सगळ्यासाठी मोठी तयार केली असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा खुलासा करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे विभागाला यश आलं आहे. तिघांची हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. सख्ख्या भावानेच घराच्या मालमत्तेच्या वादातून आपल्या भावाचे संपूर्ण कुटुंबाला संपवल्याचे समोर आलं आहे. हे कृत्य अत्यंत क्रुर असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी म्हटलं आहे.

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकण पाडा येथे राहणारे ३५ वर्षीय तरुण मदन पाटील, त्यांची गरोदर पत्नी अनिशा मदन पाटील आणि मुलगा विवेक मदन पाटील या तिघांची हत्या करण्यात आली होती.  ग्रामस्थांना दशक्रियेच्या विधीसाठी जात असताना तिघांचे मृतदेह घराजवळ असलेल्या ओहोळामध्ये रविवारी सकाळी सापडले होते. तिघांवरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसत होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, रायगड पोलिसांनी मृत मदन पाटील यांचा लहान भाऊ हनुमंत पाटील व त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

घराच्या मालमत्तेच्या वादातून हनुमंत पाटील याने आपल्या सख्ख्या भावाचे संपुर्ण कुटुंब संपवले. आरोपी हनुमंतने भाऊ मदन, त्यांची सात महिन्यांची गरोदर पत्नी अनिषा पाटील आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा हे रात्री आपल्या घरात गाढ झोपेत असताना त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. या प्रकरणाच्या तपासासाठी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा ज्ञानेश्वर टेळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पाच पथके तयार करण्यात आली होती.

दरम्यान, तिघांच्या हत्येसाठी हनुमंतने मोठी तयारी केली होती.आरोपी हनुमंत हा चिकनपाडा गावापासून तीन किमीवरील पोशीर येथे मामाच्या घरी गणेशोत्सवासाठी गेला होता. कारण गणेशोत्सवानिमित्त आपण रात्रभर मामाच्या घरी असल्याचे भासविण्याचा त्याचा प्रयत्न केला. मामाकडे रात्रीचे जेवण घेऊन आपल्या मामाला आपण माळ्यावर झोपण्यास जातो असं त्याने सांगितले. त्यानंतर रात्री मदन पाटील यांच्या घरी जाऊन तिघांची हत्या केली. त्यानंतर आरोपी हनुमंत पुन्हा मामाकडे येऊन झोपला आणि सकाळी सहा वाजता गणपती पुजेसाठी देखील उपस्थित राहिला.

मात्र या हत्याकांडानंतर पोलिसांनी सर्वांची चौकशी सुरु केली तेव्हा त्यांना हनुमंतवर जास्त संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडावउडवीची उत्तर दिलं. हत्येची दिवशी आरोपीने रात्री पांढरा शर्ट घातला होता. मात्र सकाळी तो टी शर्टवर होता. तसेच पोशीर ते चिकन पाडा इथल्या रस्त्यातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी हनुमंत जाताना दिसला होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता हनुमंतने हत्या केल्याच कबुल केलं.

टॅग्स :RaigadरायगडKarjatकर्जतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस