शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

मुंबईतील कचरा समुद्रमार्गे रायगडमध्ये! कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:41 IST

मुंबईतील कच-याचा भस्मासुर समुद्रमार्गे रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकत आहेत. त्यामुळे निर्सगाने नटलेल्या ऐतिहासिक जिल्ह्याचे विद्रूपीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन उद्योगावर होत आहे.

- आविष्कार देसाई

अलिबाग : मुंबईतील कच-याचा भस्मासुर समुद्रमार्गे रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनारी धडकत आहेत. त्यामुळे निर्सगाने नटलेल्या ऐतिहासिक जिल्ह्याचे विद्रूपीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम येथील पर्यटन उद्योगावर होत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यामध्ये कोणतीच सक्षम यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे शहर आहे. अलिबाग शहराला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व आहे. त्याचप्रमाणे येथील नारळ-सुपारीच्या बागा, सुरूच्या बनाचे पर्यटकांना खूपच आकर्षण असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येत असतात. याचीच भुरळ पडल्याने विविध सिने अभिनेते-अभिनेत्री, रतन टाटा यंसारखे बलाढ्य उद्योजक, मद्य सम्राट विजय मल्या यांचे येथे टोलेजंग बंगले आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या आणि प्रदूषणापासून दूर असणाºया अलिबाग तालुक्यात त्यांनी आपापले सेंकड होम येथे उभारलेले आहेत.वीकेण्डला अथवा निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी त्यांचे नेहमीच येथे येणे-जाणे असते.मात्र, आता ज्या कचरा, प्रदूषण, धकाधकीच्या जीवनापासून दूर आलेल्यांना आता येथील समुद्रकिनारी येणाºया कचºयाची चांगलीच समस्या जाणवू लागली आहे.मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर अद्यापही केला जात आहे. तो प्लास्टिक कचरा नद्यांच्या माध्यमातून समुद्राला मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीची हद्द समुद्रामध्ये निमुळती असल्याने समुद्रातील कचरा हा थेट तेथील किनाºयावर जमा होतो. त्याचप्रमाणे मांडवा हद्दीतील समुद्रकिनारीही कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. समुद्रकिनारीच धनदांडग्याचे बंगले मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांना आता त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.१अलिबाग तालुक्यात पर्यटन वृद्धीसाठी विविध पर्यटन महोत्सवही आयोजित केले जातात. पर्यटकांना आवश्यक असणाºया सुखसोयी, विविध हॉटेल्स, रेस्टारंट, कॉटेज येथे मोठ्या संख्येने असल्याने पर्यटकांची येथे चांगलीच रेलचेल असते.२वाढत्या पर्यटनामुळेही कचºयाचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. त्यातच स्थानिकही कचºयाचे योग्य नियोजन करीत नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.३स्थानिक ग्रामपंचायतींकडे कचरा गोळा करण्याची यंत्रणा आहे. मात्र, त्या कचºयावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही.४अलिबाग शहरासह आसपासच्या तब्बल ६२ ग्रामपंचायतींकडे डंपिग ग्राउंडच नसल्याने रोजच्या लाखो टन कचºयाची समस्या निर्माण झाली आहे.किहीम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजच्या रोज कचरा उचलण्याचा प्रयत्न केला जातो. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला आलेल्या उधाणामुळे मुंबईतील सर्व कचरा किहीम हद्दीतील समुद्रकिनारी सरकतो, असे किहीमच्या सरपंच शिल्पा साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.किहीम ग्रामपंचायतीप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींचीही समस्या आहे. लगतच्या पाच ग्रामपंचायतींना एकत्र करुन त्यांच्यामार्फत कचरा व्यवस्थापनासाठी चांगला प्रकल्प राबवता येऊ शकतो. यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उभारल्यास प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी लोकमताल सांगितले.