शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई-गोवा मार्गाचे केंद्राकडे हस्तांतरण! ठेकेदारांवर कडक कारवाईचे संकेत; कामाला उशीर होत असल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 3:46 AM

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. ठेकेदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने, गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. ठेकेदार बदलूनही काम पूर्ण होत नसल्याने, गृहनिर्माणमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे काम तातडीने व्हावे, यासाठी या महामार्गाचे काम केंद्र सरकारने करावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा शनिवारी मेहता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या सहा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.सुरु वातीला हे काम सुप्रीम कंपनीकडे होते. त्यांनी ते काम निर्धारित वेळेत पूर्ण केले नाही. जे काम झाले आहे, त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने मेहता यांनी संताप व्यक्त केला. सुप्रीम कंपनीकडून ते काम काढून नंतर जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनी यांना देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडूनही काम रखडलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महामार्गाच्या कामाबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर एक बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीमध्ये ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, कामाबाबत टाइम बॉउंड ठरवून घेणे, मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागावे, यासाठी हे काम केंद्र सरकारकडे वर्ग करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येऊन तशी शिफारस करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या दोन्ही टप्प्यांतील भूसंपादनाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. रुंदीकरणामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हे टाळण्यासाठी लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे लागणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.बैठकीतीलमहत्त्वाचे विषयअलिबाग तालुक्यातील अलिबाग-रेवस आणि अलिबाग-रेवदंडा येथे नवीन रस्त्याचे काम आठ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. अलिबाग-रोहे या मार्गाच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्याने याही कामाला वेगाने सुरुवात होणार आहे.- खराब रस्त्यांमुळे आरोग्यसेवेसाठी तप्तर असणाºया १०८ या रु ग्णवाहिकेलारु ग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी दहा मिनिटांऐवजी अर्धा तास लागतो. संबंधित विभागाने यामध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, असे आदेशही देण्यात आले.- जिल्ह्यामध्ये जनधन योजनेंतर्गत २ लाख २० हजार ६२८ खाती उघडण्यात आली आहेत. अटल सुरक्षा योजनेचा लाभ १० हजार ३२८, पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत १ लाख ३,४९२, मुद्रा बँक योजनेमार्फत १३ हजार ९७८ लाभार्थ्यांना १५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.- वीजप्रकल्पांसाठी आवश्यक कोळशाचा पुरवठा सुरु ळीत सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात पडलेला विजेचा तुटवडा भरून काढण्यात येणार आहे. ही परिस्थिती दहा दिवसांत पूर्वपदावर येणार असल्याने जनतेची विजेच्या भारनियमनातून सुटका होईल.विकास संवाद हा कार्यक्र म प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. भाजपाने केलेल्या विकासकामांचाच त्यामध्ये समावेश राहणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. जनतेच्या विकासासाठी भाजपाची जनतेशी असलेली बांधिलकी कायमच राहणार आहे.- प्रकाश मेहता, पालकमंत्री

टॅग्स :Raigadरायगड