शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 22:32 IST

प्रवासी वाहनचालक त्रस्त : पर्यटन, दळणवळणावर परिणाम

संतोष सापते श्रीवर्धन : महाराष्ट्रातील महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असलेला मुंबई-गोवा खड्ड्यात गेला आहे. येथे रस्त्याची सर्वत्र चाळण झाली असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही, अशी येथील स्थिती आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूककोंडी व अपघातास चालना मिळत आहे. परिणामी, प्रवाशांचे, तसेच स्थानिकांचे हाल होत आहेत.मुंबई- गोवा महामार्गाचे काम चालू आहे मात्र माणगाव ते पेण रस्ता आजमितीस वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडल्याने त्याचा परिणाम पर्यटन, दळणवळण व सण उत्सव या सर्व बाबींवर होत आहे.

कोकणाला मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, आज या महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पोलादपूर, महाड, माणगाव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, वडखळ, पेण ते पनवेल सर्व रस्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही. माणगाव ते वडखळ मार्गावर रस्त्याची अवस्था बिकट झाली असून हा महामार्ग आहे का? या विषयी जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. माणगाव सोडल्यानंतर पुढे प्रवास करताना वाहनचालकांना वाहने चालविणे मुश्कील नव्हे, तर अशक्य झाले आहे. कोलाड पुलाची अवस्था गंभीर झाली असून, त्या वरून वाहन चालविणे धोक्याचे झाले आहे. नागोठणे ते वडखळ अवजड वाहतूक नियमित निदर्शनास येते; त्यामुळे वाहतूककोंडी ही सदैव जनतेच्या वाट्याला येत आहे. नागोठणे व वडखळच्या हद्दीत विविध कंपन्या आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या जास्त दिसून येते. वडखळ ते पेण प्रवास हे दिव्य मानले जाते. पेण ते वडखळ अवघे सहा किलो मीटरचे अंतर नसताना एक तासापेक्षा जास्त वेळ लागत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माणगाव ते वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संबंधित अभियंता पी. डी. फेगाडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. तर माणगाव ते पनवेल हा रस्ता आमच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे आपण संबधित खात्याशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य महामार्ग अभियंता सचिन निफाडे यांनी सांगितले.

पर्यटकांची संख्या होतेय कमी१) कोकणातील श्रीवर्धन, दिवेआगार, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, महाड ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गावे आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे. कारण मुंबई ते माणगाव १५० किमीचे अंतर आहे, परंतु त्यासाठी वेळ प्रसंगी चार ते पाच तासांचा कालावधी लागत आहे.२) परिणामी, पर्यटक कोकणच्या ऐवजी प्रवास सुखकारक ठरेल अशा ठिकाणाला प्राधान्य देत आहेत. या दिवाळी सणाला कोकणात घरी आलेल्या सर्व चाकरमान्यांना रस्त्याच्या दुर्दशेचा त्रास सहन करावा लागला आहे. भाऊबीजेच्या दिवशी कोलाड ते वडखळ रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्याने रस्त्यावर सर्वत्र लांबच लांब वाहनांच्या रांगा दिसून आल्या.३)महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, तंव्हा जाईल, परंतु आजमितीस कमीतकमी रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती तरी डागडुजी करावी व सामान्य व्यक्तीस प्रवास करता येईल, असा रस्ता तयार करावा अशी मागणी प्रवासी, स्थानिक नागरिकांकडून होत आहे.नागठणे ते वडखळ प्रवास नकोसा वाटत आहे. रस्त्याची परिस्थिती अतिशय भयंकर झाली आहे. कॉलेज जातांना दररोज जास्त वेळ जातो. जनतेच्या प्रतिनिधींनी एकदा तरी सार्वजनिक वाहनातून पेण, वडखळ ते नागोठणे प्रवास केल्यास त्यांना रस्त्यांची दुर्दशा समजेल. - पायल नाईक, विद्यार्थिनी, विधि विद्यालय, अलिबाग.

अलिबागला जाताना माणगाव ते वडखळ रस्त्यावर वाहन चालविणे अतिशय कठीण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालविताना कोणता खड्डा चुकवायचा हा प्रश्न पडतो. कोणत्याही खड्ड्यात गाडी गेली, तरी त्रास हा होतोच. परिणामी, वाहनांचे नुकसान होत असून देखभालीवर खर्च होत आहे. - हेमंत चांदेकर, व्यावसायिक, महाड.

टॅग्स :Potholeखड्डेhighwayमहामार्ग