शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, चौपदरीकरणाचे काम थांबल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 12:15 AM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले.

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव ते महाड या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, दहा किलोमीटरचा प्रवास जीवघेणा झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरण सुरू असून, गेले तीन महिने महामार्गाचे चौपदरीकरण लॉकडाऊनमुळे थांबले होते. यामुळे पावसाळ्यात जुन्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. दासगाव आणि महाडदरम्यान नवीन रस्त्याला जोडणाºया जुन्या रस्त्यावर दासगाव, वहूर, केंबुर्ली या गावांच्या हद्दीत खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीकडून बुजविण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांच्या सततच्या पावसामुळे पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.आजच्या परिस्थितीत दासगाव ते महाड १० किलोमीटरचा प्रवास या महामार्गावरून धोक्याचा झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये या खड्ड्यांच्या ठिकाणी पंधरा मोटारसायकलस्वारांना अपघात झाला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे हे काम सुरू असलेल्या ठेकेदार कंपनीने भरायचे आहेत. हे खड्डे वेळीच भरणे अपेक्षित होते; परंतु ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती महामार्गावर निर्माण झाली आहे. तरी ठेकेदार कंपनीने गांभीर्य लक्षात घेत, खड्डे ताबडतोब भरावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. पडलेल्या खड्ड्यांबाबत ठेकेदार कंपनीकडे संपर्क साधला असता, प्रोजेक्ट अधिकारी जे.एम. नायडू यांनी खड्डे लवकरच व्यवस्थित बुजविले जातील, असे सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग