शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

कशेडी बोगद्यासाठी सुरुंग स्फोट; घरांना बसताहेत हादरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 23:30 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत कशेडी घाटात कातळी गाव हद्दीत बोगदा तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत आहे.

प्रकाश कदम पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत कशेडी घाटात कातळी गाव हद्दीत बोगदा तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या क्षमतेचे सुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत. परिणामी, दोन किलोमीटर अंतरात असलेल्या कातळी, भोगाव बुद्रुक कामतवाडी या गावांतील घरांना हादरे बसत असल्याने धोका निर्माण झाला आहे.कशेडी घाटात सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुका हद्दीत कशेडी घाटात केवळ सहा किलोमीटर अंतराचा पोलादपूर शहरापासून भोगाव खुर्द दत्तवाडीपर्यंत रस्ता तयार केला जात आहे. पुढे भोगाव खुर्द भोगाव बुद्रुक या गावाजवळून कामतवाडीच्या डोंगरात दोन बोगद्यांतून जाणारा हा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्याच्या कशेडी गाव हद्दीतील दरेकरवाडीजवळ संपत आहे. येथून एक बोगदा पोलादपूर तालुक्याकडे तर पोलादपूर तालुक्याकडून खेड तालुक्याकडे अशा दोन्ही बाजूंनी बोगद्यांची कामे सुरू आहेत. पोलादपूर बाजूने तयार करण्यात येणाºया बोगद्यात सुरुंग लावण्यात येत आहेत. या सुरुंगाच्या स्फोटांची क्षमता व तीव्रता मोठी असून, याचे हादरे दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या भोगाव बुद्रुक गावातील घरांना बसत आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान केलेल्या सुरुंगांच्या स्फोटांमुळे अंदाजे दोन किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोगाव बुद्रुक गावातील घरांना मोठे हादरे बसले. परिणामी, घरांच्या भिंती खिळखिळ्या होऊन धोका होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.>दरड कोसळण्याचा धोका२००५ मध्ये २५ व २६ जुलैच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये कामतवाडीवर दोन्ही बाजूने दरडी कोसळल्या होत्या, यात दोन घरांचे नुकसानही झाले होते. तेव्हापासून दरवर्षी पोलादपूर तहसील कार्यालयाकडून पावसाळ्यात नोटीस बजावण्यात येत असून, सुरक्षित जागेत स्थलांतर करण्याची सूचना करण्यात येत असते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.वास्तविक, कशेडी घाटात मागील कित्येक वर्षांत करण्यात आलेल्या विकास कामांसाठी वेळोवेळी प्रचंड क्षमतेचे सुरुंगांचे स्फोट घडवून आणण्यात आले. त्यामुळे डोंगर खिळखिळा झाला. २००५च्या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण डोंगराला भेगा पडल्या, पायथ्यापर्यंत मोठे चर पडले. पावसाचे पाणी झिरपून फुगलेली माती दगडधोंड्यांसह खाली घसरली. घरांच्या भिंतींना तडे गेले.घरांचा पाया खचला. भूवैज्ञानिक आणि भूजल संशोधकांनी केलेल्या पाहणीत हे क्षेत्र भूस्खलन प्रवण असल्याचे जाहीर केले आहे. आजही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, तर या भागात दरडी कोसळतात. अशा या डोंगरात सातत्याने मोठ्या क्षमतेचे सुरुंग लावण्यात आले, तर पावसाळ्यात येथील कामतवाडी आणि भोगाव बद्रुक गावांना धोका संभवतो.>कामतवाडी या गावाच्या खालून जमिनीच्या पोटातून बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्यात करण्यात येणाºया सुरुंगाच्या स्फोटांमुळे आमच्या घरांच्या भिंती हादरतात. घरांचे पत्रे थडथडतात, कपाटातील भांडी कोसळतात, जर पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, तर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.- विष्णू सकपाळ, ग्रामस्थ.>केंद्र सरकारची परवानगी आहे. मात्र, स्फोटांची तीव्रता कमी करण्याची खबरदारी घेऊ.- महाडकर, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम अधिकारी>ब्लास्टिंग करण्यास ग्रामपंचायतीची परवानगी देण्यात आली आहे.- अमोल मोरे, सरपंच कोंढवी ग्रामपंचायत