शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:12 AM

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे.

- जयंत धुळपअलिबाग -  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे. भूस्खलनाचा धोका जाणवल्यास गामस्थांचे स्थलांतरण करण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार २० अतितीव्र भूस्खलन धोका असलेल्या गावांत उप विभागीय महसूल अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी अशा पथकांनी पाहणी केली आहे.माती, गावांतील उतार, डोंगर कड्यांची भौगोलिक रचना, जलस्रोत, माती-जल परिणाम आदी वैज्ञानिक निकषांवर भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निकषांमध्ये अतिवृष्टीमुळे कोणत्याही गावांस सद्यस्थितीत धोकादायक परिस्थिती निर्माण नसल्याचा निष्कर्ष पाहणी पथकाने केल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनअधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.जिल्ह्यातील १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांमध्ये ५०० मि.मी. वा त्यापेक्षा अधिक सतत अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका उद्भवू शकतो, असे अनुमान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने नमूद केले आहे. परिणामी, या गावांतील पर्जन्यमानावर सतत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.दहा गावांना मिळून एक पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या नोंदी सातत्याने घेण्यात येत आहेत.यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या काळात या १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांपैकी एकाही गावात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले नसल्याने धोका उद्भवलेला नाही; परंतु आगामी काळात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास संभाव्य धोक्यातून बचावासाठी तात्पुरते स्थलांतर करण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला आहे.एक लाख ग्रामस्थांच्या स्थलांतराची व्यवस्थातात्पुरत्या स्थलांतराकरिता आवश्यक सुरक्षित इमारतीची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सज्ज ठेवण्यात आली आहे. या १०३ संभाव्य भूस्खलन धोकाग्रस्त गावांची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड