शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

चिरनेर सत्याग्रहाचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:30 AM

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला.

- मधुकर ठाकूरउरण  - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला. यात आठ आंदोलनकर्त्यांना हौतात्म्य आले. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात, यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळ गावी सरकारने स्मारके उभारली आहेत. चिरनेर येथे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हुतात्म्यांना शासकीय इतबारे आदरांजली वाहिली जाते. मंगळवारी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन संपन्न होणार आहे.स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० मध्ये जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. चिरनेर सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्रातील १९३०-३३ च्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे उपख्यान मानले जाते. शांततामय रीतीने सुरू असलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात शेतकरी,आगरी,आदिवासी असे सुमारे सहा हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील तरुणांचा सहभाग मोठा होता. आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट केला. गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले, तर ३८ आंदोलक जखमी झाले. जखमी आंदोलकांना कायमचे अपंगत्व आले. म्हणूनच स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्र माप्रसंगी अतिथी म्हणून मावळचे खा. श्रीरंग बारणे, सिडको महामंडळ अध्यक्ष तथा आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील, म्हाडाचे बाळासाहेब पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. अनिकेत तटकरे, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, आस्वाद पाटील, प्रमोद पाटील, उमा मुंडे, नारायण डामसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सरकारने आठ हुताम्यांची स्मारकेमूळ गावांमध्ये उभारलीलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी ( चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई ), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली),परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात त्यांच्याच मूळ गावी उभारली आहेत. अशा या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे आयोजित केला जातो. यावेळी शासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदनाही दिली जाते. येत्या २५ सप्टेंबर रोजीही चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड