शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:29 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र

रायगड - महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात येत आहे. जवळपास 23 हजार कोटींचा हा पुतळा आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. पण, हे सरकार पुतळ्यांच राजकारण करून सर्वांना मूर्ख बनवित आहे. तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण शेवटी काय मिळालं ? असा प्रश्नही हार्दिक यांनी उपस्थित केला आहे.  

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेळी, हार्दीक पटेल यांनी राज्य सरकार आणि भाजपला टार्गेट करताना महाराष्ट्रातील पुतळ्याचा मुद्दा उचलून धरला आहे. गुजरातमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे भूमीपूजन 2007 मध्ये झाले होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठी तब्बल 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाट पाहावी लागली, यासाठी म्हणजेच 10 वर्षांचा कालावधी लागला. पुतळ्यावरुन लोकांना मूर्ख बनविण्याचं काम तेथील सरकारने केलं आहे. आता, महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. मात्र, आज राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. नाशिकपासून मुंबईपर्यंत 180 किमीपर्यंत शेतकरी चालत आले. पण, सरकार सोईस्करपणे हे सर्व विसरून जाते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे देशासमोरील सर्वात मोठे प्रश्न असल्याचे हार्दीक पटेल यांनी म्हटले. तलवार घेऊन निघणाऱ्या शूर वीर मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण मिळालं काय ? असा प्रश्न हार्दिक यांनी विचारला आहे. सरकारकडून केवळ पुतळ्यांचं राजकारण करुन जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज