शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:29 IST

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र

रायगड - महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात येत आहे. जवळपास 23 हजार कोटींचा हा पुतळा आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. पण, हे सरकार पुतळ्यांच राजकारण करून सर्वांना मूर्ख बनवित आहे. तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण शेवटी काय मिळालं ? असा प्रश्नही हार्दिक यांनी उपस्थित केला आहे.  

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेळी, हार्दीक पटेल यांनी राज्य सरकार आणि भाजपला टार्गेट करताना महाराष्ट्रातील पुतळ्याचा मुद्दा उचलून धरला आहे. गुजरातमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे भूमीपूजन 2007 मध्ये झाले होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठी तब्बल 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाट पाहावी लागली, यासाठी म्हणजेच 10 वर्षांचा कालावधी लागला. पुतळ्यावरुन लोकांना मूर्ख बनविण्याचं काम तेथील सरकारने केलं आहे. आता, महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. मात्र, आज राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. नाशिकपासून मुंबईपर्यंत 180 किमीपर्यंत शेतकरी चालत आले. पण, सरकार सोईस्करपणे हे सर्व विसरून जाते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे देशासमोरील सर्वात मोठे प्रश्न असल्याचे हार्दीक पटेल यांनी म्हटले. तलवार घेऊन निघणाऱ्या शूर वीर मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण मिळालं काय ? असा प्रश्न हार्दिक यांनी विचारला आहे. सरकारकडून केवळ पुतळ्यांचं राजकारण करुन जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला.  

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलMaratha Reservationमराठा आरक्षणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज