शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जनतेचा जाहीरनामा गायब; रायगडमध्ये फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 08:49 IST

रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुती व इंंडिया आघाडीकडून उमेदवार घोषित केले असून, त्यांचा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. गावोगावी बैठका, कोपरा सभा, लहान सभा होत आहेत. मात्र, यात रायगडच्या विकासावर कोणीही बोलताना दिसत नाही. एकमेकांची उणीदुणी काढण्यावर उमेदवारांचा अधिकचा भर दिसत आहे.

रायगडचा जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांत विकासकामे अधिक झाली आहेत. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अलिबाग, श्रीवर्धन, पेण, महाड, गुहागर, दापोली या विधानसभा मतदारसंघात अनेक विकास आजही रखडलेला आहेत. इंडिया आघाडीकडून उद्धव सेनेचे अनंत गीते, तर महायुतीकडून अजित पवार गटाचे सुनील तटकरे रिंगणात आहेत. त्याचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे.  नाराज असलेले मित्र पक्षही प्रचारात सहभागी होऊ लागले आहेत. अद्याप मोठ्या सभा झालेल्या नाहीत. मात्र, संवाद मेळावे, गाव बैठका, छोट्या सभांमधून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका करीत आहेत. आतापर्यंत विकासाचा एकही मुद्दा प्रचारात आलेला नाही. त्यामुळे रायगडचा विकास या निवडणुकीच्या प्रचारातून गायब झाला आहे का, असा सवाल मतदार करीत आहेत. 

प्रमुख समस्याजिल्ह्यातून जाणारा मुंबई, गोवा महामार्ग आजही बारा वर्षांनंतर रखडलेला आहे. पाणी समस्या हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आरोग्याची समस्या, बेरोजगारी, रखडलेले प्रकल्प, महामार्ग, कॉरिडॉर, घटत चाललेले भातक्षेत्र, बंद पडत असलेले उद्योग, शिक्षणाचे प्रश्न, ऐतिहासिक ठेवा, पर्यटन सुविधा, विकासकामे हे मुद्दे प्रचारात उपस्थित होत नाहीत.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४