शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:47 IST

२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.

- आविष्कार देसाई अलिबाग : २०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक ही श्रीवर्धन आणि कर्जत मतदार संघात ऐकायला मिळाली होती आणि फक्त एकट्या पनवेल मतदार संघामध्ये भाजपचे कमळ फुलले पहायला मिळाले. गेल्या निवडणुकीच्या मानाने २०१९ साली होणारी निवडणूक सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी आहे. शिवसेना आणि भाजपची जागा वाटपाबाबतची धुसफूस विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याने ते या निवडणुका एकत्र लढणार आहेत. यासाठी अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण या जागांवर शेकाप लढवणार तर कर्जत आणि श्रीवर्धनची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. त्यामुळे अलिबाग, पेण, उरण, पनवेल, महाड या जागांवर काँग्रेसने लढत देण्यास तयार असल्याने काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसल्यास नवल वाटायला नको.अलिबाग मतदार संघामध्ये शेकापचे आमदार सुभाष पाटील हे उमेदवार आहेत, तर शिवसेनेकडून महेंद्र दळवी आणि रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे आणि भाजपकडून अ‍ॅड.महेश मोहिते यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस