शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मतदान; लोकशाहीचा दीपोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:16 IST

Maharashtra Election 2019 : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आॅनलाइन सुविधा, दंडाची तरतूद आणि शेवटी सक्ती, या उपाययोजना आहेतच. परंतु केवळ समाजसेवेचा पिंड असणारे ‘सच्चे उमेदवार’ देणे, हे देखील आवश्यक आहे. मतदारांनी लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करुन मतदान केल्यास लोकशाही नक्कीच बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

वंदनीय चारित्र्यवान कोण?

खरे तर, निवडणुकांचा निव्वळ बाजार भरल्याचे दृश्य पाहुन,अनेक सुज्ञ नागरिक मुद्दामहून मतदानासाठी जात नसल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. आचारविचारांची संहिता नसते. ‘सत्तातुरानाम न लज्जा न भयम’ अशी नेत्यांची राजकीय शैली..! बिनबुडाचे आरोप, सुडबुद्धीचे राजकारण, असंस्कृतपणाचे हावभाव,अश्लाघ्य टीका, विकासाची तळमळ नाही, भ्रष्टाचार, मंदीची होरपळ असूनही सरकार अलबेल असल्याचे नाट्य रंगवणे, आणि वंदनीय चारित्र्याचा अभाव असल्याने कुणास मतदान करावे? मतदानाचा टक्क कमी होण्याचे, हेच एक कारण असावे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अशिक्षित, गोरगरीब लोकं आहेत. डोंगरदऱ्यात, लहान लहान वाड्या-तांड्यांवर ते राहतात. त्यामुळे मतदानाची सक्ती नकोच. आॅनलाईन मतदानाची कल्पना वरवर चांगली वाटत असली तरी, त्यातूनही गुंडागर्दी अधिक वाढेल. आपल्या देशात बाहुबली नेत्यांची कांही कमी नाही. एका खोलीत बंद करून मतदान करून घेण्याची सक्ती होणार नाही, याची शाश्वती कोण देणार?- डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, चिकलठाणा, औरंगाबाद.

मतदारांचे परिवर्तन करा

आपण मतदान केल्याने देशात काहीच फरक पडत नाही. कोणाचेही सरकार आले तरी आपल्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मकता वाढते. सरकारी व खाजगी कर्मचारी सुस्त असतात. बाकी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. हे आता सर्वश्रुत झाले आहे. हुशार तरुणही नोकरी शोधत आहेत अशा बेरोजगार तरुणांमध्ये भवितव्याबद्दल नैराश्य आले आहे. निवडणुकीत उभे असलेल उमेदवार हे पिढ्यान्पिढ्या तेच आहेत किंवा त्यांच्या घरातीलच आहेत. फक्त पक्ष बदलला जातो. पैशाच्या जोरावर निवडून येणे आणि निवडून आल्यावर त्याची भरपाई करणे आणि पुढील निवडणुकीची तरतूद करणे असे चक्र सुरू आहे. अशांबद्दल जनतेच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे. तरीही लोक राष्ट्रीय कर्तव्य चुकवत नाहीत, पण उमेदवारांनीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा वास्तवाचे भान सतत ठेवले तर जनताही सक्ती न करता मतदान करेल. त्यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडेल. म्हणून सक्ती न करता परिवर्तन करणे गरजेचे आहे. मतदान म्हणजे मताचे दान आहे. दानासाठी सक्ती करता येणार नाही.- तात्याबा गणपती जाधवर, श्रीरामनगर, खेडशिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.

उमेदवार चांगले द्या

भारताची लोकशाही प्रणाली जपण्याची कुणाला आवड नाही, असे नाही. पण निवडणुकीतील वातावरण इतके गलिच्छ असते की कुणाला मतदान करावे हेच जनतेला कळत नाही. त्याचबरोबर प्रचारातील मुद्दे, आश्वासने, प्रचार करणाºया कार्यकर्त्यांची व्यसने, प्रलोभने या बाबी किळसवाण्याच असतात. आपल्या समस्या सुटत नाहीत हे जनतेने अनेकवेळा अनुभवले आहे. उमेदवारच असे द्या की लोकांनी खास त्यांच्यासाठी मतदानाला आले पाहिजे. मतदान सक्तीचे करण्याऐवजी चांगले उमेदवार द्या

- विकास जिजाबा पवार, भिकमचंदनगर, पिंप्राळा रोड, जळगाव.

मतदारांनाही भत्ता द्या

देशाचे भवितव्य घडवणाºया मतदारास दुर्लक्षिले जाते. आपला रोजगार बुडवून तो मतदानासाठी येतो. मतदानामुळे ज्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो त्यांना भत्ता दिला जात नाही. म्हणून मतदारांस एका दिवसाचा भत्ता म्हणून रोख २०० रूपये दिले पाहिजेत. मतदान झाल्याबरोबर त्या टेबलावरच भत्ता वाटप झाले पाहिजे, अशी सूचना निवडणूक आयोगाला कराविशी वाटते. ह्याची तरतूद रोजगार हमी योजनेत हवी. त्यामुळे ॅमतदानाचा टक्का हमखास वाढेल.- पी. एन. धसाडे,भारती निवास, उमरी, जि. नांदेड.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान