शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मतदान; लोकशाहीचा दीपोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:16 IST

Maharashtra Election 2019 : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आॅनलाइन सुविधा, दंडाची तरतूद आणि शेवटी सक्ती, या उपाययोजना आहेतच. परंतु केवळ समाजसेवेचा पिंड असणारे ‘सच्चे उमेदवार’ देणे, हे देखील आवश्यक आहे. मतदारांनी लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन करुन मतदान केल्यास लोकशाही नक्कीच बळकट होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

वंदनीय चारित्र्यवान कोण?

खरे तर, निवडणुकांचा निव्वळ बाजार भरल्याचे दृश्य पाहुन,अनेक सुज्ञ नागरिक मुद्दामहून मतदानासाठी जात नसल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. आचारविचारांची संहिता नसते. ‘सत्तातुरानाम न लज्जा न भयम’ अशी नेत्यांची राजकीय शैली..! बिनबुडाचे आरोप, सुडबुद्धीचे राजकारण, असंस्कृतपणाचे हावभाव,अश्लाघ्य टीका, विकासाची तळमळ नाही, भ्रष्टाचार, मंदीची होरपळ असूनही सरकार अलबेल असल्याचे नाट्य रंगवणे, आणि वंदनीय चारित्र्याचा अभाव असल्याने कुणास मतदान करावे? मतदानाचा टक्क कमी होण्याचे, हेच एक कारण असावे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अशिक्षित, गोरगरीब लोकं आहेत. डोंगरदऱ्यात, लहान लहान वाड्या-तांड्यांवर ते राहतात. त्यामुळे मतदानाची सक्ती नकोच. आॅनलाईन मतदानाची कल्पना वरवर चांगली वाटत असली तरी, त्यातूनही गुंडागर्दी अधिक वाढेल. आपल्या देशात बाहुबली नेत्यांची कांही कमी नाही. एका खोलीत बंद करून मतदान करून घेण्याची सक्ती होणार नाही, याची शाश्वती कोण देणार?- डॉ. नूतनकुमार सी. पाटणी, चिकलठाणा, औरंगाबाद.

मतदारांचे परिवर्तन करा

आपण मतदान केल्याने देशात काहीच फरक पडत नाही. कोणाचेही सरकार आले तरी आपल्या परिस्थितीमध्ये काहीच फरक पडत नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नकारात्मकता वाढते. सरकारी व खाजगी कर्मचारी सुस्त असतात. बाकी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. हे आता सर्वश्रुत झाले आहे. हुशार तरुणही नोकरी शोधत आहेत अशा बेरोजगार तरुणांमध्ये भवितव्याबद्दल नैराश्य आले आहे. निवडणुकीत उभे असलेल उमेदवार हे पिढ्यान्पिढ्या तेच आहेत किंवा त्यांच्या घरातीलच आहेत. फक्त पक्ष बदलला जातो. पैशाच्या जोरावर निवडून येणे आणि निवडून आल्यावर त्याची भरपाई करणे आणि पुढील निवडणुकीची तरतूद करणे असे चक्र सुरू आहे. अशांबद्दल जनतेच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे. तरीही लोक राष्ट्रीय कर्तव्य चुकवत नाहीत, पण उमेदवारांनीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या किंवा वास्तवाचे भान सतत ठेवले तर जनताही सक्ती न करता मतदान करेल. त्यांच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडेल. म्हणून सक्ती न करता परिवर्तन करणे गरजेचे आहे. मतदान म्हणजे मताचे दान आहे. दानासाठी सक्ती करता येणार नाही.- तात्याबा गणपती जाधवर, श्रीरामनगर, खेडशिवापूर, ता. हवेली, जि. पुणे.

उमेदवार चांगले द्या

भारताची लोकशाही प्रणाली जपण्याची कुणाला आवड नाही, असे नाही. पण निवडणुकीतील वातावरण इतके गलिच्छ असते की कुणाला मतदान करावे हेच जनतेला कळत नाही. त्याचबरोबर प्रचारातील मुद्दे, आश्वासने, प्रचार करणाºया कार्यकर्त्यांची व्यसने, प्रलोभने या बाबी किळसवाण्याच असतात. आपल्या समस्या सुटत नाहीत हे जनतेने अनेकवेळा अनुभवले आहे. उमेदवारच असे द्या की लोकांनी खास त्यांच्यासाठी मतदानाला आले पाहिजे. मतदान सक्तीचे करण्याऐवजी चांगले उमेदवार द्या

- विकास जिजाबा पवार, भिकमचंदनगर, पिंप्राळा रोड, जळगाव.

मतदारांनाही भत्ता द्या

देशाचे भवितव्य घडवणाºया मतदारास दुर्लक्षिले जाते. आपला रोजगार बुडवून तो मतदानासाठी येतो. मतदानामुळे ज्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो त्यांना भत्ता दिला जात नाही. म्हणून मतदारांस एका दिवसाचा भत्ता म्हणून रोख २०० रूपये दिले पाहिजेत. मतदान झाल्याबरोबर त्या टेबलावरच भत्ता वाटप झाले पाहिजे, अशी सूचना निवडणूक आयोगाला कराविशी वाटते. ह्याची तरतूद रोजगार हमी योजनेत हवी. त्यामुळे ॅमतदानाचा टक्का हमखास वाढेल.- पी. एन. धसाडे,भारती निवास, उमरी, जि. नांदेड.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान