शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:08 AM

वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे

पाली : वाकण ते पाली फाटा या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम एमएसआरडीने हाती घेतले आहे. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या मोऱ्यांसाठी मोठे पाइप टाकण्यात आले आहेत. मात्र जुन्या रस्त्याला असलेल्या लहान मोºया पाण्याचा जोरदार प्रवाह सहन न करू शकल्याने जुने पाइप पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा रस्ता खचून भगदाड पडले आहे. पालीचे तहसीलदार बाबूराव निंबाळकर आणि पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र रस्ता खचून चार तास उलटले तरी एमएसआरडीचे अधिकारी आणि कंत्राटदार पाहणीसाठी आले नाहीत.रस्ता वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद पडल्याने वाहनांची रांग लागली होती. रस्त्यातील माती आणि पाइप काढण्याचे काम सुरू केले असून पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. रस्ता वाहून गेल्याने मोरीचे काम करण्यासाठी वेळ लागू शकतो.पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक व जीवघेणा बनला आहे. एमएसआरडीसीच्या गलथान कारभाराविरोधात लोकशाही व सनदशीर मार्गाने सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी रस्ता वाहतुकीला व्यवस्थित करून देऊ असे आश्वासन एम.एस.आर.डी.सी.एल.चे अधीक्षक अभियंता कर्नल रवींद्र घोडके, कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे, डेप्युटी इंजिनिअर सचिन निफाडे यांनी दिले होते. या घटनेला चार दिवस होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहून गेला आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असताना खोदकामात रस्ता खचत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पावसाची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९८.४९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालीआहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस अलिबाग १५५.०० मि.मी., पेण-१६०.०० मि.मी., मुरु ड-६०.०० मि.मी., पनवेल-१५८.५० मि.मी., उरण-१०६.०० मि.मी., कर्जत-८६.३० मि.मी., खालापूर-७१ मि.मी., माणगाव-७० मि.मी., रोहा-११० मि.मी., सुधागड-७७ मि.मी., तळा-१३० मि.मी., महाड-३८ मि.मी., पोलादपूर-५०, म्हसळा-१०५ मि.मी., श्रीवर्धन-४४ मि.मी., माथेरान-१५५ मि.मी. नोंदविण्यात आला आहे.मोहोपाडा : रसायनीसह इतर भागात रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसाला सुरु वात होताच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सोसाट्याच्या वाºयामुळे पावसाने रविवार रात्रीपासून सोमवारी पूर्ण दिवस चांगलेच झोडपून काढले. यावेळी दांड-रसायनी रस्त्यावरील काही झाडे उन्मळून पडली, तर मोहोपाडा बाजारपेठेत काही ठिकाणी रस्त्याशेजारील दुकानांचे नामफलक कोसळले. सोमवारी रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत होती. रसायनी पाताळगंगा परिसराच्या मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू असणाºया मोहोपाडा बाजारपेठेत सोमवारी पूर्ण दिवस शुकशुकाट जाणवला.वेळास-आदगाव रस्ता खचतोयदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास-आदगाव मार्गावरील मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आहे. याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये नाराजी आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टिकोनातून प्रमुख समुद्रकिनारे आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनाºयांबरोबरच वेळास व आदगाव समुद्रकिनाराही पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. मात्र वेळास-आदगाव मार्ग खड्डेमय झाला असून रस्त्याला आणखी मोठे भगदाड पडण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.विरेश्वर उद्यानाची सुरक्षा भिंत कोसळलीखोपोली : वरची खोपोली येथे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या विरेश्वर उद्यानाची भिंत उद्घाटनापूर्वीच कोसळल्यामुळे उद्यानाच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळली. सलग दोन विधानपरिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे उद्यानाचे उद्घाटन लांबणीवर पडले, अन्यथा मे महिन्यामध्येच या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. जर उद्घाटन झाले असते तर निकृष्ट बांधकामामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. स्थानिक नगरसेविका माधवी रिठे व जिनी सॅम्युअल यांनी नगरपरिषद सभागृहात वेळोवेळी विरेश्वर उद्यान व महावीर उद्यानाच्या कामाबाबत होत असलेली दिरंगाई व कामाचा दर्जा याबाबत आवाज उठवला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी उद्घाटनापूर्वीच उद्यानाची भिंत कोसळली.