शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 21:50 IST

निखिल म्हात्रे अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी ...

निखिल म्हात्रे

अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी आणल्या आहेत. गौरी माहेरपणासाठी घरी येतात. यासाठीच शेतकरी महिला खास पारंपरिक स्वयंपाक करून त्यांचे कौडकौतुक करतात, अशी श्रद्धा आहे. कृषी संस्कृती आणि मातृसत्ताक जीवन पद्धतीचे प्रतिक असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज गौरींचे आगमन, उद्या पूजन आणि परवा विसर्जन होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथे डोंगरावरून गौरी आणल्या जातात. पारंपरिक भाजी भाकरीचा नैवेद्य, भेंड या झाडाच्या फुलांनी गौरीपूजन अशा पद्धतीने हा सण खेडोपाडी साजरा केला जातो. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देताना पौराणिक आख्यान गीतांवर नृत्य करून करण्याची प्रथा अलिबाग तालुक्यातील मल्याण या गावात शतकोनशतके सुरू आहे. ग्रामदेवतेच्या पुढे गौरीची प्रतिमा डोक्यावर घेऊन पुरूष गौरीकथा आणि महात्म्य उपस्थितांपुढे मांडतात आणि नंतरच नदीत तिचे विसर्जन केले जाते. ही शतकोनशतके परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.

येथील शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की गौर त्यांच्या घरी येते ती माहेरपणासाठी. तिला आवडीचे पदार्थ दिले जातात. तिचे पूजन अर्चन वंशवाढीसाठीसाठी आवश्यक असते. गौरीचे वर्णन कृषी संस्कृतीच्या विलोभनीय गीतांमधून केले जाते. कुंतीने हे व्रत केल्याचेही या गीतांमधून सांगितले जाते. भेंडीच्या झाडांना फुले येतात, नद्या भरून वाहत असतात तेव्हा गौरीचे आगमन होते, असे वर्णनही यावेळी गायलेल्या गीतांमधून व्यक्त होते. गौरी-गणपतीच्या सणाची पारंपरिकता मल्याण गावाने जपली आहे. विशेष म्हणजे गौरीलाही शिव आणि गणपती प्रमाणे नृत्य प्रिय आहे अशी परंपरा अधोरेखित करणारा विसर्जनापूर्वीचा कार्यक्रम गौरीच्या महतीचा वेगळा आयाम समोर आणतो.

गणपती जणू घरातील एक प्रमुख अशा स्वरुपातच त्याचे आगमन होते. तुपाची वात, तेलाची समई पेटविली जाते. हि अखंडीतपणे गणेश मुर्ती प्रतिस्थापने पासून विसर्झनापर्यंत अखंडीतपणे ठेवली जाते. हि ठेवण्या मागे श्रध्दा हाच एक विषय असतो. एकंदरीत गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसाच्या आत्मियतेचा, श्रेध्देचा वर्षनुवर्षे चालत आलेला विषय आहे. गाव गाता गजाली आणि रात्रीस खेळ चाळे या कार्यक्रमांमधून कोकणचे विद्रुप चेहरे समोर आणेल जात असले तरी कोकण हा सण उत्सव साजरा करणारा, भाविकता जपणारा, एकमेकाशी नाल जोडलेला, बाहेरुन काटेरी वाटत असला तरी आतून रसाळ गोड ग-या सारखा असलेला मधूर प्रदेश आहे. या प्रदेशात गणेशोत्सव हा सर्वात प्रिय आणि लोक मनाशी जोडला गेलेला सण आहे. या उत्सवाच्या निमित्ताने कोकणची केमिस्ट्रीच बदलून जात एकमेकांशी संवाद साधणारा मने जोडणारा असा हा सण होऊन जातो.घराघरात गणपतींचे अगमन होते. घरांची सजावट, दिव्यांची रोषणाई, आणि मंगलमय वातावरणात गणपती सण साजरा होऊ लागतो. गौरी – गणपती असे आई – मुलाचे नाते या उत्सवाच्या निमित्ताने घरोघर जागते केले जाते. गौराई म्हणजे पार्वती हि सृष्टीची जननी आहे. पार्वतीचे रुप कुलदेवतेच्या रुपात पुजले जाते कुल वंश वाढावा म्हणून गौरी पुजनाला नवविवाहीता पाच प्रकारची फळे, पाच प्रकारची पाने, नारळ, विडा, साडी आणि जंगलातील फळा फुलांनी गौराईचे पुजन करतात. गौराईला नऊवारी साडी नेसून नवविवाहीता आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी देविला नवस करते. वंश वेल वाढावी म्हणून पुजा केली जाते. असा हा गौराईचा सण गणपतीतील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो असे प्राध्यापीका लीना पाटील यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागGanpati Festivalगणेशोत्सव