शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

बदलत्या शिक्षणपद्धतीनुरूप शिक्षकांनी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:54 AM

शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली

अलिबाग : शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच वारसा घेऊन आज शिक्षक परिषद राज्यात काम करीत आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे, बहुजनांना शिक्षणापासून दूर करण्याची व्यवस्था वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांनी जागृत राहून, हे प्रकार थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. पंडित पाटील, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, बीडचे उपनगराध्यक्ष रजपुत इनामदार, प्राध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रा. विनोद इंगेवाडा, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व्यंकटराव जाधव, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष विकास चाभरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जे समाजात चांगले काम करतात, त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा परिषदेने सुरू केली आहे. खºया अर्थाने स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत केले जात आहे. जी चळवळ महात्मा ज्योतीराव फुलेंनी त्या वेळी सुरू केली. ती पुढे नेण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असून शेतकरी, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकून समाजात टिकतील, त्यादृष्टीने, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.