शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कारगिल विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 23:29 IST

महाविद्यालयीन युवकांचा सहभाग : राज्यातील ९० हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना युद्धपटाचा घेता येणार आनंद

आविष्कार देसाई अलिबाग : २६ जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात यावर्षी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा यद्धपट राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहात एकाच दिवशी आणि एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ९० हजार महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना या युद्धपटाचा आनंद घेता येणार आहे. हा युद्धपट मोफत दाखवण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

देशावर होणाऱ्या आतंकवादी हमल्यांना आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता चोख प्रतिउत्तर देऊन त्यांना चारीमुंड्या चीत करतात. भारतीय सैन्याची हिंमत, पराक्रम त्यांचे शौर्य आजही अबाधित आहे. सीमेवर आपले शूर जवान तैनात असल्याने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्यामुळेच आपण शांतपणे झोपू शकतो. अशा सर्वच जवानांबाबत प्रत्येक भारतीयांना अभिमान आणि प्रेम आहे.

चीन, पाकिस्तान यांनी आपल्यावर हल्ले केले होते. त्यांच्या गोळ््यांना भारतीय जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. आतंकवाद्यांना हाताशी धरुन पाकिस्तान देशाच्या विविध भागांमध्ये आतंकवादी हमले करत आहेत. १९९९ साली कारगिल युद्ध झाले होते. ते भारताने बखुबी जिंकले होते. पाकिस्तानने यातून धडा घेतला नाही. त्यांच्या कुरापती सुरुच राहिल्या. त्यांनी मुंबईवरील २६/११ हल्ला, गुरदासपूर हल्ला, पठाणकोट येथे वायू सेनेवर हल्ला त्यानंतर १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी ब्रिगेड मुख्यालयावर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये भारताचे १९ सैनिक आणि चार दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर ११ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. भारतीय सैन्याच्या अभिमानास्पद कामगिरीने देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

२६ जुलै १९९९ रोजी करगिल युद्धातही भारताने शौर्य गाजवले होते. तो दिवस विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्यात आगळवेगळ््या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहांमध्ये उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा युद्धपट दाखवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. याबाबतची बैठक संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात १५ जुले रोजी पार पडली. या बैठकीला चित्रपटाचे निर्माते, वितरक यूएफओचे प्रतिनिधी, राज्यातील एक पडदा चित्रपटगृहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चित्रपट दाखवण्याच्या सूचना- सत्यजीत दळीया चित्रपटाचे सॅटलाइट प्रक्षेपण यूएफओमार्फत एकाच वेळी सर्व ठिकाणी सकाळी १० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. अलिबागमधील ओम, ब्रम्हा, विष्णू, महेश या सिनेप्लेक्समध्येही उरी हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून हा चित्रपट दाखवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तयारी सुरु असल्याचे चित्रपट गृहाचे मालक सत्यजीत दळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनUri MovieउरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस