शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कांदळवन संरक्षण योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 03:01 IST

वर्ष संपत आले तरी अंमलबजावणीसाठी समितीची स्थापनाच नाही

- जयंत धुळपअलिबाग : कांदळवन (मॅन्ग्रुव्ह) वनस्पतींचे संरक्षण करणे आणि त्यावर अवलंबून असलेल्या किनारी भागातील ग्रामस्थांची उपजीविका यांचा मेळ घालणे, तसेच खासगी मालकीच्या क्षेत्रातील कांदळवनापासून देखील उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, कांदळवनांचा दर्जा उंचावणे यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ २०१७-१८ ते २०१९-२० अशा तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्याचा शासन निर्णय २० सप्टेंबर २०१७ रोजी झाला. मात्र, निर्णय होऊन वर्ष होत आले तरी योजनेच्या अंमलबजावणीकरिता आवश्यक जिल्हास्तरीय समितीची स्थापनाच अद्याप झालेली नाही. तसेच कांदळवने असलेल्या किनारी भागातील गावांत योजनेची माहितीही नसल्याचे समोर येत आहे.राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, या किनाऱ्यालगत सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने सद्यस्थितीत अस्तित्वात आहेत. या कांदळवनांमुळे समुद्रकिनाºयाचे संरक्षण होते. कांदळवनांचे पर्यावरणीय महत्त्व विचारात घेता, त्यांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्रदान करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. त्यास अनुसरून आतापर्यंत १५ हजार ८८ हेक्टर शासकीय जमिनीवरील आणि एक हजार ७७५ हेक्टर खासगी क्षेत्रावरील कांदळवने अनुक्रमे ‘राखीव वने’ आणि ‘वने’ म्हणून राज्य सरकारने अधिसूचित केली आहेत. मासे व खेकडे यांना त्यांच्या अल्पवयात संरक्षण मिळून उपयोगी उत्पादनात वाढ होते. पर्यटनाची साधने उपलब्ध होऊन किनारी जैवविविधता टिकून राहाण्यास मदत होते, हे तज्ज्ञांच्या अभ्यासांती सिद्ध झाले असल्याने राज्य शासनाने ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ अमलात आणण्याचा हा निर्णय घेतला.राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अमलात आणली आहे. कांदळवनांना किनारी गावांतील ग्रामस्थांचे उत्पन्नाचे साधन बनवून त्यांचे संरक्षण करणे, असा महत्त्वपूर्ण हेतू या योजनेचा आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत महसूल आणि वन खाते या दोन्ही स्तरांवर वर्ष होत आले तरी कोणत्याही प्रकारे पुढाकार घेण्यात आलेला नाही. शासकीय कांदळवनांचे संरक्षण करणे, त्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उपजीविकेचा त्यांच्याशी मेळ घालणे. खासगी मालकीच्या कांदळवनांपासून देखील उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे. कांदळवनांचा दर्जा उंचावणे यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर कांदळवनांचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ सत्वर राबविणे अपेक्षित होते.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे अनिवार्य‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ सुयोग्यप्रकारे अमलात आणण्याकरिता राज्यस्तरावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन), कोकण विभागीय महसूल आयुक्त, ठाणे व कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त, दोन विकास समितीचे अध्यक्ष हे सदस्य असून, उप वनसंरक्षक (कांदळवन) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणे अपेक्षित आहे. समितीचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हा कृषी अधीक्षक, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, पर्यावरण विभाग प्रतिनिधी, दोन विकास समितीचे अध्यक्ष, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक हे सदस्य आहेत, तर संबंधित विभागाचे वन अधिकारी वा उप वनसंरक्षक हे समितीचे सदस्य सचिव राहाणार आहेत.मात्र, ही समितीच अद्याप स्थापन करण्यात आली नसल्याने योजना अंमलबजावणीचा मुहूर्त योजनेचे पहिले वर्ष संपायला आले तरी झालेला नाही.‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ खारेपाटातील कांदळवन क्षेत्राशी निगडित गावांत अमलात आणण्याकरिता गतवर्षी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. लवकरच गावांत येऊन बैठका घेऊ आणि योजना अमलात आणू, असे त्या वेळी सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीकरिता किनारी भागातील एकाही गावात शासनाचा कोणीही प्रतिनिधी गावात गेल्या वर्षभरात आलेली नाही.- राजन भगत, जिल्हा संघटक,श्रमिक मुक्ती दल.‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’विषयक समिती जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली नाही. अशा समितीची बैठकही झालेली नाही.- किरण पाणबुडे,निवासी उप जिल्हाधिकारी,रायगड

टॅग्स :Raigadरायगडenvironmentवातावरण