शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पत्रकार उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:21 AM

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन आज आठ

वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन आज आठ वर्षे झाली तरी देखील अद्याप ५० टक्के काम पूर्ण झालेले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगडसह कोकणातील पत्रकार रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख व कोकण मराठी परिषदेचे किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महामार्गावर वडखळ नाक्यावर मानवी साखळी व पोस्टर आंदोलन करणार आहेत.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी गेली नऊ वर्षे रायगड व कोकणातील पत्रकार विविध आंदोलनाद्वारे शांततेच्या मार्गाने लढत आहेत. पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. सुरु वातीला हे काम युध्दपातळीवर सुरू होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या व जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे तसेच पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य बनले आहे. पळस्पा ते झाराप, कशेडी घाटापर्यंत रोज कुठे ना कुठे अपघात होत असून त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, परंतु त्याकडे राज्य व केंद्र शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जाणिवेतून पत्रकार रस्त्यावर उतरणार असून सोबत विविध संस्था, वाहनचालक संघटना या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी सर्व पत्रकार व जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल, कार्याध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, धर्मानंद गायकवाड यांनी केले आहे.