शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ, पाच वर्षांत ४५ हजार २८५ तरुण बेकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:54 IST

पाच वर्षांत ४५ हजार २८५ तरु ण बेकार : केवळ दोन हजार ८३५ जणांना मिळाल्या नोकऱ्या

जयंत धुळप 

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठमोठे उद्योग उभारण्यात आले. मात्र, तरीही येथील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न कायम असल्याचे रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांतील युती सरकारच्या कालावधीत एसएससी, बारावी, पदवी आणि उच्च पदवीधर अभियांत्रिकी क्षेत्रातील एकूण ४८ हजार १२० बेरोजगार तरुणांनी रोजगार प्राप्तीकरिता आपली नावनोंदणी केली. केवळ ५.९८ टक्के म्हणजे दोन हजार ८३५ बेरोजगार तरुणांना काम मिळाले. तर तब्बल ४५ हजार २९५ तरु ण अजूनही नोकरीच्या शोधात आहेत.

२०१४ ते २०१८ या पाच वर्षांच्या प्रतिवर्षीचा रोजगार संधीचा विचार केला, तर २०१४ मध्ये म्हणजे युती सरकारच्या कारभाराच्या पहिल्या वर्षी मोठ्या उत्साहात विक्रमी अशा १२ हजार ०८४ बेरोजगार तरुणांनी रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे रोजगाराकरिता मोठ्या अपेक्षेने नोंदणी केली; परंतु प्रत्यक्षात १२ हजार ०८४ नोंदणीकृत बेरोजगारापैकी केवळ १.८९ टक्के म्हणजे २२९ तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होऊ शकली. तर ११ हजार ८५५ बेरोजगार तरुणांचा भ्रमनिरास होऊन, मोठी फौज युती सरकारच्या पहिल्या वर्षी जिल्ह्यात तयार झाली.

युती सरकारच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना मेक इन इंडिया या सरकारच्या योजनेवरचा विश्वासच उडाला आणि अनेक बरोजगार तरुणांनी रायगड जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे पाठच फिरवली. परिणामी, दुसºया वर्षी पहिल्या वर्षीच्या तुलनेत बेरोजगार तरुणांची नोंदणी घसरली आणि निम्म्यावर आली. यावर्षी पाच हजार २५९ बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली. मात्र, सरकारचे रोजगार देण्याचे प्रमाणही घटले आणि दुसºया वर्षी केवळ ०.६४ टक्के म्हणजे केवळ ३४ बेरोजगारांना सरकार रोजगार उपलब्ध करून देऊ शकले. दुसºया वर्षीदेखील पाच हजार २२५ बेरोजगार तरुणांची फौज तयार झाली.तिसºया वर्षी बेरोजगार तरुण जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाकडे पाठ फिरवत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारी प्रसिद्धी माध्यमातून बेरोजगार युवकांना आकर्षित करण्याकरिता जाहिरातींचा सपाटा लावण्यात आला. परिणामी, पुन्हा एकदा सरकारवर विश्वास ठेवण्याची मानसिकता बेरोजगार तरुणांनी केली.

२०१६ मध्ये रायगड जिल्ह्यात १६ हजार २१७ बेरोजगार तरुणांच्या नोंदणीचा प्रतिसाद मिळाला; परंतु रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता आवश्यक नियोजनात सरकार अपयशी ठरले. रोजगार उपलब्ध करून देण्याचा टक्का वाढवता आला नाही. परिणामी, जिल्ह्यात रोजगाराकरिता नोंदणी केलेल्या १६ हजार २१७ बेरोजगार तरुणांपैकी केवळ २.२३ टक्के म्हणजे अवघ्या ३६३ बेरोजगारांना रोजगार मिळू शकला आणि तिसºया वर्षीदेखील तब्बल १५ हजार ८५४तरु ण बेरोजगार राहिले.२०१७ मध्ये बेरोजगार उमेदवार नोंदणीचा आकडा पुन्हा निम्यावर आला आणि पाच हजार ६०६ बेरोजगार तरुणांची नोंदणी होऊ शकली.सरकारला आली अखेरच्या वर्षी जागच्युती सरकारच्या चौथ्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. त्याच वर्षी करण्यात आलेल्या मतदार गणनेतून रायगड जिल्ह्यात तरुण व नवमतदारांची संख्या विक्रमी वाढत असल्याचे लक्षात आल्यावर, पुन्हा एकदा तरुण आणि नवमतदार बेरोजगार तरुणांची आठवण सरकारला झाली.च्सरकारी माध्यमातून जाहिराती आणि यंत्रणेस टारगेट देऊन यातून निवडणुकांच्या पूर्वीच्या वर्षी २०१८ मध्ये आठ हजार ९५४ बेरोजगार तरुणांची नोंदणी शक्य झाली. रोजगार उपलब्धीचा टक्का २४.३३ टक्के वर नेऊन दोन हजार १७९ तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, तरीही सहा हजार ७७५ तरु ण बेरोजगार राहिलेच.२०१७ मध्ये ५,६०६ पैकी ०.५३ टक्के म्हणजे अवघ्या ३० बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. यामुळे तरु णांचा पुन्हा भ्रमनिरास झाला. एकं दर आकडेवारीवरून बेरोजगाराची संख्या वाढल्याचे दिसून येते.

टॅग्स :Employeeकर्मचारीjobनोकरी