शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

बर्फगोळा, शीतपेय विक्रेत्यांची चलती; शहाळी, कलिंगड, द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला

By निखिल म्हात्रे | Published: March 29, 2024 12:38 PM

काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या वातावरणात गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसा शुकशुकाट दिसून येतो. मार्च महिन्याचा शेवटाचा आठवडा रायगडकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. दिवसभर वाऱ्याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला; मात्र काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे. संपूर्ण आठवडाभर पारा तिशीच्या पुढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहेत. या व्यावसायिकांची त्यामुळे चलती आहे.

बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे; मात्र थंडपदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे....सध्या नागरिकांनी शरीरास थंडावा देणारी म्हणजेच शहाळी, कलिंगड, द्राक्ष, केळी, सीताफळ या फळांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. मात्र, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, शीतपेय याचे सेवन टाळावे.- ज्ञानेश्वर अरसळे, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :alibaugअलिबागSummer Specialसमर स्पेशल