शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 23:21 IST

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे

मुंबई/रायगड - मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. कोकणातील जनतेलाही महत्त्वाचं आवाहन केलं आहे. यावेळी, आंदोलक मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याबद्दल संताप व्यक्त केला. तसेच, मी रिटर्न गिफ्ट देऊ शकतो, असे म्हणत राज यांनी थेट इशाराही दिला.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. राज ठाकरेंनी जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हटले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे.  खरंतर मी पण पदयात्रेत सहभागी झालो असतो, पण काही महिन्यांपूर्वी माझं ऑपरेशन झालं त्यामुळे इतकं चालण्याची मला अजून परवानगी नाही. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून सांगायचं आहेच, असे म्हणत राज यांनी सरकारला थेट इशारा दिला. यावेळी, मुंबई-गोवा रस्त्यावरुन आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अंडरवेअरवर बसवल्याचा संताप व्यक्त केला.

''परवा माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, पोलीस स्टेशनमध्ये सरकारने अंडरवेअरवर बसवलं, ह्या सरकारला मला एकच सांगायचं आहे ते मग आधीचं असो की आत्ताच, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो'', अशा शब्दात राज यांनी सरकारला इशाराच दिला आहे. 

कोकणी बांधव शांत कसा राहू शकतो?

गेली १७ वर्ष हा मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. ह्या काळात ह्या रस्त्यावर २५०० माणसं गेली, गाड्यांचं किती नुकसान झालं असेल त्याची मोजदादच नाही. दरवेळेला खड्डे भरून सगळ्या सरकारांनी वेळ मारून नेली आहे. इथे येताना तर मी एक अजबच प्रकार पाहिला तो म्हणजे ह्या महामार्गावर मध्येच पेव्हरब्लॉक टाकलेत. अहो जगात सर्वत्र रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतात आणि फुटपाथ पेव्हरब्लॉकचे. इथे सगळं उलटंच. आणि असं तुमच्या आयुष्याशी खेळून पण कोकणी बांधवाला काही वाटत नाही, तो शांत कसा राहू शकतो ? त्याच त्याच लोकांना कसं निवडून देऊ शकतो हे मला कळत नाही. 

दबाव आणला तरी जमिनी विकू नका

राज्यातील एक महामार्ग १७ वर्ष का रखडतो? ह्या मागे मला एक षडयंत्र जाणवतंय. आज कोकणातील बांधवांच्या जमिनी स्वस्तात विकत घ्यायच्या आणि पुढे रस्ता चांगला झाला की अव्वाच्या सव्वा भावाने व्यापाऱ्यांना विकायच्या. आणि हे आपलीच लोकं करत आहे. कुंपणच शेत खात असेल तर करायचं काय ? माझी कोकणातील बांधवांना हात जोडून विनंती आहे की जमिनी विकू नका. कितीही आमिषं दाखवली, कितीही दबाव आणला तरी विकू नका. बाकी ह्या व्यापाऱ्यांचे काय करायचं ते आम्ही बघून घेतो. तुम्ही जमीन सोडू नका म्हणजे झालं, असं आवाहनही राज यांनी कोकणवासीयांना केलंय.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMumbaiमुंबईhighwayमहामार्ग