शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

शेकडो मासेमार बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:29 IST

उरणमध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल : मासेमारीसाठी गेलेल्या ८ ते १० बोटींना तडाखा बसण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असतानाच रायगडात ‘निसर्ग’ चक्रीवादळ दाखल होण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर उरण परिसरातील किनारपट्टीवरील अनेक गावांमधील नागरिक, मच्छीमारांची घबराट पसरली. शेकडो मच्छीमारांनी बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किनारपट्टीवरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उरणमधून पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली असतानाही काही मच्छीमार बोटी अवैधरित्या खोल समुद्रात गेल्याचे सांगितले जात आहे. अशा ८ ते १० बोटी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बुधवारी अरबी समुद्रमार्गे रायगडसह मुंबई समुद्र किनाºयाला चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वादळ जवळपास १४० किमी ताशी वेगाने किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील घारापुरी, मोरा, हनुमान कोळीवाडा, केगाव, पीरवाडी-नागाव, पाणजे, करंजा, खोपटा, वशेणी खाडी, बोरखार, न्हावा, न्हावा- खाडी, गव्हाण, कोपर, बेलपाडा आदी गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनानेही खबरदारीची उपाययोजना म्हणून किनारपट्टीवरील गावांना, मच्छीमारांना दवंडी पिटत सतर्क राहाण्याच्या इशारा दिला आहे.

उरण परिसरात मोरा, हनुमान कोळीवाडा, करंजा, खोपटा, गव्हाण आदी गावांमध्ये सुमारे एक हजार मच्छीमारी बोटी आहेत. कोरोना त्यानंतर पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मच्छीमार बोटी परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या विविध बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या इशाºयानंतर मच्छीमारांकडून हजारो बोटी करंजा, मोरा बंदरातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी दिली.

तसेच संस्थेच्या सभासदांपैकी एकही मच्छीमार बोट अवैधरित्या मासेमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली नसल्याची माहितीही नाखवा यांनी दिली. मात्र पावसाळी मासेमारी बंदीनंतरही उरण परिसरातील सुमारे १५ ते २० बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बोटी मासेमारी करून परतलेल्या आहेत. मात्र ८ ते १० बोटी परतल्या नाहीत. त्यामुळे त्या वादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे..चक्रीवादळाच्या इशाºयानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून केगाव- दांडा, करंजा, मोरा येथील सुमारे ३० ते ३५ कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. तसेच उरणकरांंच्या नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके उरणमध्ये दाखल होणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळी मासेमारी बंदी असल्याने १ जूनपासून उरण परिसरातून एकही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नाही. मात्र अवैधरित्या मासेमारीसाठी बोटी गेल्या आहेत की नाही याचीही चौकशी करण्यात येत आहे.- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण