शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेकडो मासेमार बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:29 IST

उरणमध्ये एनडीआरएफची दोन पथके दाखल : मासेमारीसाठी गेलेल्या ८ ते १० बोटींना तडाखा बसण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असतानाच रायगडात ‘निसर्ग’ चक्रीवादळ दाखल होण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या इशाऱ्यानंतर उरण परिसरातील किनारपट्टीवरील अनेक गावांमधील नागरिक, मच्छीमारांची घबराट पसरली. शेकडो मच्छीमारांनी बोटी सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून किनारपट्टीवरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उरणमधून पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली असतानाही काही मच्छीमार बोटी अवैधरित्या खोल समुद्रात गेल्याचे सांगितले जात आहे. अशा ८ ते १० बोटी चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बुधवारी अरबी समुद्रमार्गे रायगडसह मुंबई समुद्र किनाºयाला चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे वादळ जवळपास १४० किमी ताशी वेगाने किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे उरण परिसरातील किनारपट्टीवरील घारापुरी, मोरा, हनुमान कोळीवाडा, केगाव, पीरवाडी-नागाव, पाणजे, करंजा, खोपटा, वशेणी खाडी, बोरखार, न्हावा, न्हावा- खाडी, गव्हाण, कोपर, बेलपाडा आदी गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनानेही खबरदारीची उपाययोजना म्हणून किनारपट्टीवरील गावांना, मच्छीमारांना दवंडी पिटत सतर्क राहाण्याच्या इशारा दिला आहे.

उरण परिसरात मोरा, हनुमान कोळीवाडा, करंजा, खोपटा, गव्हाण आदी गावांमध्ये सुमारे एक हजार मच्छीमारी बोटी आहेत. कोरोना त्यानंतर पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मच्छीमार बोटी परिसरातील ठिकठिकाणी असलेल्या विविध बंदरात नांगरुन ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या इशाºयानंतर मच्छीमारांकडून हजारो बोटी करंजा, मोरा बंदरातील सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र नाखवा यांनी दिली.

तसेच संस्थेच्या सभासदांपैकी एकही मच्छीमार बोट अवैधरित्या मासेमारीसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली नसल्याची माहितीही नाखवा यांनी दिली. मात्र पावसाळी मासेमारी बंदीनंतरही उरण परिसरातील सुमारे १५ ते २० बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बोटी मासेमारी करून परतलेल्या आहेत. मात्र ८ ते १० बोटी परतल्या नाहीत. त्यामुळे त्या वादळाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे..चक्रीवादळाच्या इशाºयानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून केगाव- दांडा, करंजा, मोरा येथील सुमारे ३० ते ३५ कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे. तसेच उरणकरांंच्या नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी एनडीआरएफची दोन पथके उरणमध्ये दाखल होणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळी मासेमारी बंदी असल्याने १ जूनपासून उरण परिसरातून एकही मच्छीमार बोट खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नाही. मात्र अवैधरित्या मासेमारीसाठी बोटी गेल्या आहेत की नाही याचीही चौकशी करण्यात येत आहे.- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण