शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

महामार्ग यंदाही ठरणार डोकेदुखी; गणेशोत्सवात प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:12 PM

वडखळ, खोपोली, माणगाव वाहतूककोंडीची प्रमुख ठिकाणे

- सिकंदर अनवारे दासगाव : दरवर्षी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात वाहन चालकांना डोकेदुखी बनतो. यंदा देखील महामार्गाची दैना झाली असून या मार्गाने प्रवास करणे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणानंतर पळस्पे ते इंदापूर दरम्याच्या रस्त्याची जी अवस्था झाली आहे, तीच अवस्था दुसऱ्या टप्प्यातील पाली आणि खोपोली मार्गाच्या रुंदीकरणामुळे झाली आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास अडचणीतून होणार असून त्यासाठी तासन्तास मोठी कसरत करावी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम पळस्पे ते इंदापूर रखडल्यानंतर गेली सहा वर्षे या मार्गावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे जवळपास ८० टक्के वाहनचालकांनी पनवेल ते कोकण मार्ग बंद करत पनवेल द्रुतगती मार्गाने खोपोली-पाली-वाकण असा मार्ग अवलंबला होता. मात्र त्याही मार्गाचे यंदा रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. आता चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याचे इंदापूरपासून चिपळूणपर्यंत काम सुरू झाले आहे. या दुसºया टप्प्याच्या अर्धवट कामामुळे चालकांसह प्रवासीही त्रस्त असून कशेडी घाट मोठ्या प्रमाणात खचला आहे. पनवेल ते चिपळूण असा सध्याचा प्रवास मोठा कसरतीचा आणि अडचणीचा झाला आहे. सध्या पनवेल ते महाड २ तासाच्या प्रवासाला तब्बल पाच ते सहा तास लागत आहेत. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.कोकणात जाणाºया प्रवाशांसाठी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग सोयीचा आहे. दरवर्षी याच मार्गावर गणपती सणामध्ये मोठ्या रांगा लागतात. दुसरा मार्ग कोकणात जाण्यासाठी असला तरी या मार्गापेक्षा जवळपास १०० किमी अंतराचा फरक पडतो. यंदा पनवेल ते इंदापूर महामार्गावरील खड्डे, पाली- खोपोली मार्गाचे रुंदीकरण आणि दुसºया टप्प्याचे रुंदीकरण या तिन्ही अडचणींना चाकरमान्यांना सामोरे जावे लागणार आहे. शासनाकडून ५ सप्टेंबरपर्यंत खड्डे भरण्याचा दावा केला जात असला तरी पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसात उखडून जात आहेत.कशेडी घाटाची भीती कायमयंदा पावसाचा जोर जास्त आहे. कशेडी घाटातील काही भाग खचला असून अतिवृष्टी झाल्यास घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात येतो.घाट बंद पडल्यानंतर याला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर विन्हेरे महाड असा मार्ग आहे. मात्र त्याही मार्गावर एक दोन ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून हा मार्ग अरुंद अवस्थेत आहे.माणगाव आणि वडखळ आजही वाहतुकीस डोकेदुखीमुंबई-गोवा महामार्गावर मुंबई ते महाड अंतरापर्यंत जवळपास दोन ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. वडखळ आणि माणगाव पेण ते वडखळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.या ठिकाणाहून अलिबाग आणि कोकणातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात अलिबागकडे जाणारी असतात. त्यामुळे खड्ड्यांमुळे अवजड वाहनांची गती कमी होते आणि या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.त्यामुळे या दोन किमीचे अंतर पार करण्यासाठी दोन-दोन तीन-तीन तास लागतात. मात्र गणपती सणामध्ये हजारो वाहनांची संख्या असल्याने या ठिकाणी चांगलीच कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यानंतर मधला टप्पा खुला असला तरी पुन्हा माणगाव या ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. सण असो किंवा इतर वेळी शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असो या ठिकाणचा वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगड