शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:31 IST

रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस : मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदरात स्थिरावल्या २०० हून अधिक बोटी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच मुरुड तालुक्यात सतत दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस बरसत असल्याने नदी-नाले व विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्ये पाणीच पाणी जमा झाले आहे, तर आगरदांडा बंदरावर २००वर बोटी स्थिरावल्या आहेत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सर्वत्र गारवा निमाण झाला आहे.

मुरुड तालुक्यात पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून, आतापर्यंत ३,०८५ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला आहे. पावसामुळे याचा परिणाम एसटी वाहतुकीवर दिसून आला. पावसामुळे कोणीही प्रवासी प्रवास करणे टाळत आहे. त्याचप्रमाणे, आगरदांडा बंदरात मुरुड तालुक्यसह श्रीवर्धन रत्नागिरी, गुजरात, कर्नाटक आदी भागांतीलही बोटी आढळून येत आहेत. सुमारे २०० हून अधिक बोटींनी येथे आसरा घेतला आहे. खोल समुद्रात जोरदार वारे व तुफान आल्याने आम्ही किनारा गाठला असल्याची माहिती येथील बोट मालकांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रशासनाकडून थांबलेल्या बोटींची काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा, त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरविण्याबाबत लक्ष दिले जात आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल झाल्याने खोल समुद्रात उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे, यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मासेमारी करणे कठीण बनले होते. धोका वाटत असल्याने सर्व बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने, मुंबई, गुजरात, कर्नाटक आयडी भागातील बोटी या ठिकाणी थांबल्या असल्याचे बैले यांनी सांगितले.

खोल समुद्रात पाऊस व जोरदार वारे झाल्यामुळे बाहेरील बोटींनी सुरक्षित अशा आगरदांडा बंदरात आसरा घेतला आहे. सुमारे दोनशे बोटी किनाºयला स्थिरावल्या आहेत. गुजरात महाराष्ट्र व दमण आदी भागांतील होड्या येथे थांबल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.-तुषार वाळुंज ,मत्स्य विकास अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस