शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:31 IST

रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस : मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदरात स्थिरावल्या २०० हून अधिक बोटी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच मुरुड तालुक्यात सतत दोन दिवस पावसाची रिमझिम सुरू असल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस बरसत असल्याने नदी-नाले व विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, शेतामध्ये पाणीच पाणी जमा झाले आहे, तर आगरदांडा बंदरावर २००वर बोटी स्थिरावल्या आहेत. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा जोर पकडल्याने सर्वत्र गारवा निमाण झाला आहे.

मुरुड तालुक्यात पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून, आतापर्यंत ३,०८५ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला आहे. पावसामुळे याचा परिणाम एसटी वाहतुकीवर दिसून आला. पावसामुळे कोणीही प्रवासी प्रवास करणे टाळत आहे. त्याचप्रमाणे, आगरदांडा बंदरात मुरुड तालुक्यसह श्रीवर्धन रत्नागिरी, गुजरात, कर्नाटक आदी भागांतीलही बोटी आढळून येत आहेत. सुमारे २०० हून अधिक बोटींनी येथे आसरा घेतला आहे. खोल समुद्रात जोरदार वारे व तुफान आल्याने आम्ही किनारा गाठला असल्याची माहिती येथील बोट मालकांनी ‘लोकमत’ला दिली.

प्रशासनाकडून थांबलेल्या बोटींची काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा, त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरविण्याबाबत लक्ष दिले जात आहे. रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल झाल्याने खोल समुद्रात उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे, यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मासेमारी करणे कठीण बनले होते. धोका वाटत असल्याने सर्व बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने, मुंबई, गुजरात, कर्नाटक आयडी भागातील बोटी या ठिकाणी थांबल्या असल्याचे बैले यांनी सांगितले.

खोल समुद्रात पाऊस व जोरदार वारे झाल्यामुळे बाहेरील बोटींनी सुरक्षित अशा आगरदांडा बंदरात आसरा घेतला आहे. सुमारे दोनशे बोटी किनाºयला स्थिरावल्या आहेत. गुजरात महाराष्ट्र व दमण आदी भागांतील होड्या येथे थांबल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.-तुषार वाळुंज ,मत्स्य विकास अधिकारी

टॅग्स :Rainपाऊस