शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याचा प्रश्न गंभीर : खंडाळा गावात नळाच्या पाण्यात जिवंत मासे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:02 IST

आरोग्याचा प्रश्न गंभीर : पाणी संकटामुळे ग्रामस्थ संतप्त

निखिल म्हात्रे 

अलिबाग : तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत हद्दीत नळाच्या पाण्यातून कचरा, शेवाळ असे प्रकार आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावात नळातून चक्क छोटी जिवंत कोळंबी (मासे) येत असल्याने खळबळ उडाली आहे. येथील ग्रामस्थांना पंधरा दिवसांनी पाणी पिण्यासाठी मिळते. त्यातच असे मासेमिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार असल्याने पाणी संकट अजून गहिरे होणार असल्याने ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत.

खंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक गेली अनेक वर्षे पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत. येथील ग्रामस्थांना १० ते १५ दिवसांनी एकदा एमआयडीसीचे पाणी ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. नळाद्वारे आलेले पाणी ग्रामस्थांना साठवून ठेवावे लागत आहे. मात्र, आता तर नळाद्वारे येणाऱ्या पाण्यामधून जिवंत छोटी कोळंबी (मासे) येण्यास सुरु वात झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी १० दिवसांनी पाणी आल्याने महिलांनी पाणी भरण्यास सुरु वात केली. मात्र पाण्यात कोळंबी दिसल्यांने पाणी पुढील १० दिवस कसे साठवून ठेवायचे, असा प्रश्न महिलांना सतावत आहे.दरम्यान, पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.महिन्यातून फक्त दोन वेळा पाणीच्महिन्यातून फक्त दोन वेळा आम्हाला पिण्याचे पाणी मिळते.च्त्या पाण्यातही आता किडे, मुंग्या, मासळी असल्याने आमच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.च्जिल्हा प्रशासनाने ही गंभीर बाब लक्षात घेऊन खंडाळा गावातील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.च्प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा आम्हाला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विकत पाणी घेण्याची पाळी : खंडाळा ग्रामपंचायतीची पाणी समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली होती. या योजनेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचारामुळे खंडाळा ग्रामस्थ आजही तहानलेलेच आहेत. ग्रामस्थांना पायपीट करून बाहेरून पाणी विकत आणावे लागत आहे. ग्रामस्थांची ही समस्या ना प्रशासन सोडवत आहे ना लोकप्रतिनिधी. यामुळे नागरिक संतापलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी समस्या चांगलेच डोके वर काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड